शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळीराजासाठी आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 21:09 IST

शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात

नाशिक : शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चितगव्हाण येथील साहेबराव करपे- पाटील या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्त्या केली. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. राज्यातील नोंद झालेल्या शेतकरी आत्महत्त्येची पहिलीच घटना होती. त्यानंतर दरवर्षी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या. राज्यात आणि केंद्रात अनेक सरकारे बदलली तरी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्त्या काही थांबल्या नाही. जोपर्यंत सरकारचे शेतकऱ्यांसंबंधी आणि शेतीसंबंधीचे धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होतच राहील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी दिला होता. ३१ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, विभागीय अध्यक्ष दीपक पगार, जगदीश इनामदार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगरप्रमुख नितीन रोठे- पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.