शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळीराजासाठी आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 21:09 IST

शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात

नाशिक : शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चितगव्हाण येथील साहेबराव करपे- पाटील या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्त्या केली. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. राज्यातील नोंद झालेल्या शेतकरी आत्महत्त्येची पहिलीच घटना होती. त्यानंतर दरवर्षी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या. राज्यात आणि केंद्रात अनेक सरकारे बदलली तरी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्त्या काही थांबल्या नाही. जोपर्यंत सरकारचे शेतकऱ्यांसंबंधी आणि शेतीसंबंधीचे धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होतच राहील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी दिला होता. ३१ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, विभागीय अध्यक्ष दीपक पगार, जगदीश इनामदार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगरप्रमुख नितीन रोठे- पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.