शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हरणबारीचे दुसरे आवर्तन आज सुटणार

By admin | Updated: February 18, 2017 00:41 IST

दबाव : तीन दिवस अगोदरच सोडले डावा व उजव्या पोटचारीत पाणी

नामपूर : हरणबारीचे दुसरे आवर्तन शनिवारी (दि. १८) सोडण्यात येणार असल्याची माहिती हरणबारी कालव्याचे शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली. गेल्या १५ दिवसांपासून मोसम खोऱ्यात शेतपिकासोबत पिण्याचा व जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला होता. पाहिले आवर्तन सुटून दोन महिने पूर्ण झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा पिके करपू लागली होती. याबाबत बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेने पाण्याचे रोटेशन मिळावे म्हणून खाकुर्डीचे पवन ठाकरे, नामपूरचे माजी सरपंच सोमनाथ सोनवणे, टेभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली होती. प्रखर मागणी लक्षात घेता हरणबारी कालवा निरीक्षक समितीने बैठक घेऊन तत्काळ आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.सदर आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, ३५० एमसीएफटी पाणी सोडले जाणार असून, किमान ५०० क्यूसेस पाणी नदीपात्रात सुरू राहील, अशी माहिती शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली आहे. हे आवर्तन सुटल्यास  मोसम नदीकाठावरील शेती सिंचनासोबत पिण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे. (वार्ताहर)