शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नाशकातून किसानसभेचे दुसरे पथक दिल्लीच्या दिशेने रवाना शेतकरी आंदोलनाला देणार बळ : अमरावती, नागपूरमार्गे राजधानीकडे करणार कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:48 IST

नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवारी (दि.२) दिल्लीकडे रवाना झाले आहे

नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवारी (दि.२) दिल्लीकडे रवाना झाले आहे. यात नाशिकसह मुंबई, रायगड आणि पालघरमधील आंदोलकांचाही समावेश असून, हे पथक नाशिकमधून अमरावतीमार्गे नागपूरमध्ये दाखल होणार आहे. नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किसानसभेचे आंदोलक दाखल होणार असून, रविवारी (दि.३) एकत्रितरीत्या दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे.किसानसभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांचे पहिले पथक नाशिकमधून दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर, आता दुसरे पथक नागपूरहून दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे. त्यासाठी नाशिकमधील आंदोलक शेतकरी शनिवारी (दि.२) गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक शहरातील परिवर्तन वादी पक्ष ,संघटना पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पथकाला पाठिंबा देण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या पथकाचे नेतृत्व किसान सभेचे राज्यसचिव राजू देसले करणार असून, त्यांच्या समवेत भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी उपस्थित राहणार आहेत.इन्फो -१केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी उत्पादन, विपणन व व्यापारसंबंधी कायेदे शेतकरी विरोधी असून, हे कायदे रद्द करा. त्याचप्रमाणे, प्रस्तावित वीजबिल विधेयकही रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलनात लढणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात नाशिकहून निघाले आहेत. या आंदोलकांचे पिंपळगाव बंसवंत, चांदवड येथील शेतकरी स्वागत करणार आहे. त्याचप्रमाणे, धुळे येथे सभा झाल्यानंतर रात्री अमरावतीत मोजरी येथे मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे.इन्फो- २आंदोलनक अमरावतीतून ३ जानेवारीला सकाळी निघून दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची सभा होणार आहे. नागपूर येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गट एकत्रित येऊन दिल्लीकडे कूच करणार असून, यात मराठवाड्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे विधवा महिलाही सहभागी होणार आहे.इन्फो-३प्रवासमार्गात भोजन व्यवस्था, कोरडा शिधाही सोबतनाशिकमधून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रवासमार्गातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांच्या भोजनाची सोय वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि गुरुद्वारांकडून केली जात आहे. असे असले, तरी नाशिकमधून दिल्लीकडे रवाना होताना आंदोलकांनी संपर्ण प्रवासात आणि दिल्लीतही काही दिवस पुरेल, असा कोरडा शिधा सोबत नेला आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप