शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तृषार्त वन्यजीव पाण्याच्या शोधात!

By admin | Updated: February 8, 2017 23:10 IST

व्यथा : हरीण, माकडांची नागरी वस्तीपर्यंत धाव

 खामखेडा : चालू वर्षी वर्षी जरी मोठ्या प्रमाणात डोंगरावर पाऊस झाला असला तरी जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगीपर्यंत डोंगराच्या पर्वतरांगा आहेत. या डोंगराच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. या विहिरीत यापूर्वी भरपूर पाणी राहत असे. उन्हाळ्यात त्यामुळे या पाण्यावर वन्यप्राण्यांची तहान भागत असे. परंतु या विहिरीचे कठडे विहिरीत ढासळल्याने विहीर दगड व मातीने भरून आल्याने उन्हाळ्यात पाणी राहत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्या प्रमाणात जंगलतोड झाली त्या प्रमाणात नवीन वृक्षांची लागवड केली गेली नाही. आणि जी काही प्रमाणात वृक्ष लागवड झाली, त्याची पाण्याअभावी किंवा देखभालीअभावी जतन झाली नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने पाण्याची पातळी खोल गेल्याने डोंगरात साधारण डिसेंबर नंतर डोंगरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसते. या जंगलामध्ये पावसाळ्यातील डोंगर उतारावरील पाणी साचून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी पावसाळ्यात वाहून जाते. या पर्वतरांगांमध्ये बिबट्याचे प्रभाव क्षेत्र आहे. आता डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने डोंगरांमध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत आसल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरांमध्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधार परिसरात भक्ष्य व पाण्याच्या शोधात फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी निघून जातात. (वार्ताहर )