शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गुदामे धोकादायक

By admin | Updated: April 4, 2016 23:59 IST

भीतीदायक : आगींमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता

 इंदिरानगर : वडाळा गावातील प्रभाग क्र. ५४मधील भंगार गुदामे आणि लहान मोठ्या कारखान्यांस लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या भर लोकवस्तीत या भंगार गुदामे आणि कारखान्यास परवानगी नसताना भंगारबाजार कसा वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेतीमध्ये गुलाब, झेंडू आणि द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत होते. परंतु जमिनीस जसजसा भाव मिळत गेला त्याप्रमाणे शेती एकएक करून विकली गेली. गावात सुमारे दहा हजार लोकांची वस्ती आहे. यामध्ये दोन ते तीन झोपडपट्टी आहेत. गावातील काही भागांत गुंठावर पद्धतीने जमिनी विकल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी स्वस्तात जमिनी घेऊन त्या ठिकाणी भंगाराचे गुदामे आणि लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. वाढणारे भंगाराचे गुदामे आणि कारखाने डोकेदुखी ठरत आहे.फेबु्रवारी, मार्च व एप्रिल महिन्यांत आग लागण्याचे प्रमाण वाढते. आतापर्यंत अनेक वेळा भंगार गुदामे आणि कारखान्यास आग लागली आहे, परंतु अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु आग लागत असल्याने परिसरातील रहिवाशांना जीव धोक्यात घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. भर लोकवस्तीत भंगार गुदामे आणि कारखाने असतानाही मनपा कोणतीही कारवाई का करत नाही. याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. (वार्ताहर)