शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

भंगार गुदामे धोकादायक

By admin | Updated: April 4, 2016 23:59 IST

भीतीदायक : आगींमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता

 इंदिरानगर : वडाळा गावातील प्रभाग क्र. ५४मधील भंगार गुदामे आणि लहान मोठ्या कारखान्यांस लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या भर लोकवस्तीत या भंगार गुदामे आणि कारखान्यास परवानगी नसताना भंगारबाजार कसा वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेतीमध्ये गुलाब, झेंडू आणि द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत होते. परंतु जमिनीस जसजसा भाव मिळत गेला त्याप्रमाणे शेती एकएक करून विकली गेली. गावात सुमारे दहा हजार लोकांची वस्ती आहे. यामध्ये दोन ते तीन झोपडपट्टी आहेत. गावातील काही भागांत गुंठावर पद्धतीने जमिनी विकल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी स्वस्तात जमिनी घेऊन त्या ठिकाणी भंगाराचे गुदामे आणि लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. वाढणारे भंगाराचे गुदामे आणि कारखाने डोकेदुखी ठरत आहे.फेबु्रवारी, मार्च व एप्रिल महिन्यांत आग लागण्याचे प्रमाण वाढते. आतापर्यंत अनेक वेळा भंगार गुदामे आणि कारखान्यास आग लागली आहे, परंतु अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु आग लागत असल्याने परिसरातील रहिवाशांना जीव धोक्यात घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. भर लोकवस्तीत भंगार गुदामे आणि कारखाने असतानाही मनपा कोणतीही कारवाई का करत नाही. याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. (वार्ताहर)