शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

भंगार बाजार ठरणार तारक की मारक

By admin | Updated: February 12, 2017 23:00 IST

परप्रांतीय, अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोपरप्रांतीयांच्या ताब्यात असलेला बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी सेनेने केलेल्या प्रयत्नांमुळे दुखावलेले अल्पसंख्याक व याच मतांवर डोळा ठेवून असलेल्या माकपा या दोन्ही पक्षांची प्रभाग क्रमांक २६ मध्ये सरळ सरळ लढत होत आहे. त्यामुळे भंगार बाजार कोणाला तारतो आणि कोणाला मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिडको व सातपूरच्या काही भागाचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २६ हा सध्याचा ४९ व ५० प्रभाग मिळून तयार झाला आहे. प्रभागातील ‘अ’ या सर्वसाधारण गटात माकपाकडून विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, सेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीर, भाजपाचे उखा चौधरी, कॉँग्रेसकडून विठ्ठल विभुते, धर्मराज्य पक्षाकडून अनंत लोहार, राष्ट्रीय समाज पक्षाकडून संजय गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वरकरणी माकपा, सेना, कॉँग्रेस असे तीन पक्षात खरी लढत दिसली तरी, तरी, भंगार बाजार हा एकमेव प्रचारात कळीचा मुद्दा आहे. परंतु हा बाजार उद््ध्वस्त झाल्याने हजारो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जाणार आहे. परप्रांतीयांची एकूण संख्या पाहता तेच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ‘ब’ या सर्वसाधारण महिला गटातून माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड, भाजपाकडून डॉ. ज्योती सोनवणे, शिवसेनेच्या हर्षदा गायकवाड, मनसेकडून कामिनी दोंदे, धर्मराज्य पक्षाकडून निर्मला पवार व अपक्ष म्हणून मनोरमा श्रीवास्तव निवडणूक रिंगणात आहेत. वसुधा कराड यांनी यापूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले असून, या गटात माकपाविरुद्ध सेना, भाजपा असे चित्र असेल. भाजपाच्या डॉ. सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती, यंदा त्या भाजपाकडून रिंगणात आहेत. ‘क’ या सर्वसाधारण महिला गटातून भाजपाने माजी नगरसेवक अलका अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. माकपाकडून रेखा खैरनार, शिवसेनेच्या भारती कुशारे, राष्ट्रवादीकडून आश्लेषा पाटील, मनसेकडून लता गोवर्धने, धर्मराज्य पक्षाकडून संगीता अहिरे यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. अलका अहिरे सोडल्या तर सारेच उमेदवार नवखे असून, या गटात भाजपाविरूद्ध सारे पक्ष अशीच लढत रंगणार आहे. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून शिवसेनेचे भागवत आरोटे, भाजपाकडून निवृत्ती इंगोले, मनसेकडून ज्ञानेश्वर बगाडे, राष्ट्रवादीकडून सद्दाम हुसेन अली शेख, राष्ट्रीय समाज पक्षाकडून शमसाद अली मोहम्मद खान, भारिप बहुजन महासंघाचे संतोष वर्मा, अपक्ष सुधाकर जादव, मधुकर जाधव हे आमने-सामने आहेत. सेनेचे भागवत आरोटे हे भंगार बाजार विरोधी कृती समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार भंगार बाजार भोवती फिरणार हे स्पष्ट आहे. या गटात सर्वच नवखे उमेदवार असल्यामुळे निश्चित अंदाज बांधता येत नसला तरी सेना, भाजपा व मनसे यांच्यातच ही खरी लढत आहे.