शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचा जलद विकास

By admin | Updated: January 26, 2017 00:31 IST

श्रीपाद नाईक : जागतिक कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीला बदलत्या हवामानाचा आणि ऋतुचक्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दशकांत नापिकीसह दुष्काळ, अवकाळी, पूर यांसह विविध समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागले आहे.   या संकटातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची गरज असून, कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीची शास्त्रोक्त पद्धत पोहोचत असल्याने शेतीचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रधान केंद्र दिंडोरी आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधपारी (दि. २५) कृषी महोत्सवाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी नाईक बोलत होते. व्यासीपठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, मौलवी इतिहाक अहमद, अलिम शेख, स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे आदि उपस्थित होते.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर आहे; मात्र ते आव्हान पेलण्याची शक्ती येथील संथ परंपरेने दिलेल्या कृषी संस्कृतीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बी-बियाणे, खते, कृषी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचेही  ते म्हणाले. तर इस्राईलच्या धरतीवर भारतीय शेती उद्योगाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.  शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थानी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)