शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचा जलद विकास

By admin | Updated: January 26, 2017 00:31 IST

श्रीपाद नाईक : जागतिक कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीला बदलत्या हवामानाचा आणि ऋतुचक्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दशकांत नापिकीसह दुष्काळ, अवकाळी, पूर यांसह विविध समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागले आहे.   या संकटातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची गरज असून, कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीची शास्त्रोक्त पद्धत पोहोचत असल्याने शेतीचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रधान केंद्र दिंडोरी आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधपारी (दि. २५) कृषी महोत्सवाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी नाईक बोलत होते. व्यासीपठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, मौलवी इतिहाक अहमद, अलिम शेख, स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे आदि उपस्थित होते.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर आहे; मात्र ते आव्हान पेलण्याची शक्ती येथील संथ परंपरेने दिलेल्या कृषी संस्कृतीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बी-बियाणे, खते, कृषी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचेही  ते म्हणाले. तर इस्राईलच्या धरतीवर भारतीय शेती उद्योगाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.  शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थानी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)