शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचा जलद विकास

By admin | Updated: January 26, 2017 00:31 IST

श्रीपाद नाईक : जागतिक कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीला बदलत्या हवामानाचा आणि ऋतुचक्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दशकांत नापिकीसह दुष्काळ, अवकाळी, पूर यांसह विविध समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागले आहे.   या संकटातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची गरज असून, कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीची शास्त्रोक्त पद्धत पोहोचत असल्याने शेतीचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रधान केंद्र दिंडोरी आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधपारी (दि. २५) कृषी महोत्सवाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी नाईक बोलत होते. व्यासीपठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, मौलवी इतिहाक अहमद, अलिम शेख, स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे आदि उपस्थित होते.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर आहे; मात्र ते आव्हान पेलण्याची शक्ती येथील संथ परंपरेने दिलेल्या कृषी संस्कृतीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बी-बियाणे, खते, कृषी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचेही  ते म्हणाले. तर इस्राईलच्या धरतीवर भारतीय शेती उद्योगाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.  शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थानी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)