शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्चाचणीशिवाय सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी ...

शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी प्रश्नचिन्ह असल्याने याविषयी नियोजन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासोबत शाळा सुरू करण्याविषयी ऑनलाइन संवाद साधला. यात शाळांचे वर्ग आणि परिसर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोविड चाचणी याविषयी चर्चा केली. त्यानुसार, यापूर्वी चाचणी झालेल्या शिक्षकांची आवश्यकतेनुसार शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी २३ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची घोषणा कारण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची आरटीपीसीआर व अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात शिक्षक व शिक्षकेतर असे मिळून सुमारे ३८ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने तसेच दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने ऐनवेळी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता ४ जानेवारीला शाळा सुरू होणार असल्या तरी गेल्यावेळी केलेल्या शिक्षकांच्या चाचण्यांना जवळपास महिनाभराचा कालावधी उलटल्याने अशा शिक्षकांची पुनर्तपासणी होणार काय, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या संभ्रम अखेर संपुष्टात आला आहे. याविषयी आणखी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि. २२) शहरांतील शाळांसदर्भाच महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. तर बुधवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचेही नितीन उपासणी यांनी सांगितले.