शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुनर्चाचणीशिवाय सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST

शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी ...

शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी प्रश्नचिन्ह असल्याने याविषयी नियोजन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासोबत शाळा सुरू करण्याविषयी ऑनलाइन संवाद साधला. यात शाळांचे वर्ग आणि परिसर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोविड चाचणी याविषयी चर्चा केली. त्यानुसार, यापूर्वी चाचणी झालेल्या शिक्षकांची आवश्यकतेनुसार शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी २३ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची घोषणा कारण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची आरटीपीसीआर ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात शिक्षक व शिक्षकेतर असे मिळून सुमारे ३८ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने तसेच दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने ऐनवेळी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता ४ जानेवारीला शाळा सुरू होणार असल्या तरी गेल्यावेळी केलेल्या शिक्षकांच्या चाचण्यांना जवळपास महिनाभराचा कालावधी उलटल्याने अशा शिक्षकांची पुनर्तपासणी होणार काय, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या संभ्रम अखेर संपुष्टात आला आहे. याविषयी आणखी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि. २२) शहरांतील शाळांसदर्भाच महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. तर बुधवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचेही नितीन उपासणी यांनी सांगितले.