शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

By admin | Updated: November 14, 2015 22:59 IST

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

नाशिक : आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना निवारा देणाऱ्या त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमात आता या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.ज्या शेतकरी माता-पित्यांनी आत्महत्त्या केली आहे, अशा अनाथ मुलांचा सांभाळ आधारतीर्थ येथे केला जातो. आज मितीस येथे सुमारे शंभर मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील अशी आहेत. याशिवाय अनाथ झालेल्या शेतकरी कुटुंबातील एक हजार मुलांची येथे स्थलांतरित करण्याची मागणी आहे सध्या ही मुले गावात पडेल ते काम करतात. त्यामुळे या मुलांना येथे सामावून घेतले तर त्यांच्या शिक्षणाचा आणि त्या अनुषंगाने भविष्यात रोजगाराचा प्रश्न सुटू शकणार आहे. मराठा महासंघाच्या वतीने यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. मुंबईत मराठा महासंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात स्थानिक संघाचे कार्यकर्ते चंद्रकांत बनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या मुलांना वारकऱ्याचा वेश करून सहभागी करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनीच शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मराठा महासंघाने मुलांसाठी शाळा सुरू करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, असे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. सदरच्या शाळेसाठी सेवानिवृत्त अभियंता चव्हाण, कमलेश पिंगळे, सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.