शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनीच उघडले शाळेचे कुलूप

By admin | Updated: July 5, 2016 00:37 IST

पिळकोस : समस्यांची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेला ठोकण्यात आलेले कुलूप कोणीही दखल न घेतल्याने पालकांनीच उघडले. एक वर्षापासून भाषा विषयासाठी पदवीधर शिक्षक नसल्यामुळे या शाळेला पालकांकडून सोमवार, दि. २७ जून रोजी कुलूप ठोकण्यात आले होते. शाळा बंद करून आठवडा उलटला तरीही पदवीधर शिक्षकाची नेमणूक केली गेली नाही. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही याची दखल न घेतल्यामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवूनही उपयोग होत नसल्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शेवटी पालकांकडून नाइलाजास्तव शाळेचे कुलूप उघडण्यात आले व शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.पदवीधर शिक्षकाची या शाळेवर नेमणूक होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद वा पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी पालकांशी व गावकऱ्यांशी चर्चा केली नाही. याउलट पालकांना सांगितले गेले की, पदवीधर शिक्षकाची नेमणूक जिल्हा परिषदेकडून केली जाईल, यात आम्ही काहीही करू शकत नसून शाळा बंद केल्याने तुमच्याच पाल्याचे नुकसान होईल.शाळा बंद करून अनेक दिवस होऊनही याची दखल जिल्हा परिषद नाशिक, गटशिक्षण अधिकारी कळवण, गटविस्तार अधिकारी कळवण व प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख यांसह लोकप्रतिनिधीनी न घेता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी पालकांनी शाळेचे कुलूप उघडून शाळा पूर्ववत सुरू केली.यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची शिक्षणाची सोय दुसरीकडे लावण्याचा आता निर्णय घेतला असून, दाखले काढून खासगी शाळेत पालक आपल्या पाल्यांना टाकणार असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.मुख्याध्यापक यांनी मागणी केली होती का हे पाहण्यासाठी शाळेचे शालेय शिक्षण समितीचे प्रोसेडिंग पाहिले असता ते प्रोसेडिंग अपूर्ण होते हे या दरम्यान निदर्शनास आले. तालुक्याच्या शिक्षण विभागालाही याची माहिती नसल्याचे तालुका पातळीवरील अधिकारी पालकांना यावेळी सांगू लागले. मग पालक ग्रामस्थ वर्षभर याबातीत निवेदन देत होते ते गेले कुठे? पालकांनी दिलेल्या निवेदनाचा तालुकास्तरावरून पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप समाजसेवक श्रीधर वाघ यांनी शिक्षण विभागावर केला. जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याशिवाय पर्याय आता पालकांपुढे नसल्यामुळे शाळा बंद करूनही शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधिनी याची दखल न घेतल्यामुळे पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)