शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शाळांच्या संरक्षक भिंतीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:49 IST

नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या असंख्य शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळेला बाह्ण घटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेकडे शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र अशी तरतूदच नसल्याने त्याचा भार आमदार निधीवर येत असल्याने संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याची मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देआमदार निधीवरस्वतंत्र लेखाशीर्ष हवे : दीपिका चव्हाण यांची मंत्र्यांकडे मागणी

नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या असंख्य शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळेला बाह्ण घटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेकडे शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र अशी तरतूदच नसल्याने त्याचा भार आमदार निधीवर येत असल्याने संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याची मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आलेल्या मुनगंटीवार यांची आमदार चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांचे या परिस्थितीकडे लक्ष वेधले. यावेळी मंत्रिमहोदयांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्णातील अनेक शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांकडून संरक्षण भिंतीची मागणी केली जाते. अनेकदा नागरिकांच्या आग्रहास्तव शाळा संरक्षक भिंतीचा खर्च आमदार निधीतून करावा लागतो. मुळातच आमदारांना मतदारसंघातील अनेक कामे असताना आमदार निधी पुरा पडत नाही. अशातच संरक्षण भिंतीसाठी देखील खर्च करावा लागतो.संरक्षक भिंती नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनादेखील अनेकदा त्रास सहन करावा लागतो. शाळा बंद झाल्यानंतर तर शाळा परिसराचा गैरवापर केला जात असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. शिवाय अतिक्रमणाबरोचरच अवैध धंदे, गुंडाचे आश्रयस्थान, मद्यपींचा अड्डा अशी शाळांची परिस्थिती होते. याचमुळे शाळांच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये देखील वारंवार चर्चिला गेला आहे. परंतु या कामासाठी जिल्हा परिषदेचे लेखाशीर्षच नसल्यामुळे या कामावर जिल्हा परिषदेला खर्च करता येत नाही. याचा भार आमदार निधीवर येत असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. आमदारांना मिळणाºया निधीतून मतदारसंघात कामे करताना निधी नियोजनाची तारेवरची कसरत त्यांना कारावी लागते. आमदार निधीतून लोकहितार्थ कामे प्राधान्याने करावी लागतात. त्याचसाठी आमदार निधी पुरेसा पडत नाही. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाºया शाळांच्या संरक्षण भिंतीचे काम हे जिल्हा परिषदेनेच करावे आणि त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे या कामांसाठी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या कामासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष असावे, अशी मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केलेली आहे. अनेक शाळा असुरक्षितशाळांची सुरक्षितता हा विषय प्राधान्यक्रमावर घेतला जात नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही चांगलीच खडाजंगी झाली होती. सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळांच्या संरक्षक भिंतीविषयी प्रश्न उपस्थितीत केलेले आहेत. शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शाळांना संरक्षण भिंतीवर खर्च करण्याचा तसेच शाळा स्थलांतराचा मुद्दादेखील चर्चेला आला आहे. सदर प्रश्न सातत्याने उपस्थितीत होत असतानादेखील लेखाशीर्षबाबत जिल्हा परिषदेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने आता आमदार चव्हाण यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.