शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नाशिक : जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिन्याभरापासून नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यानुसार ...

नाशिक : जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिन्याभरापासून नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यानुसार काही शाळाही सुरू झाल्या आहेत. परंतु शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील वर्षाप्रमाणे यावर्षी शाळा निर्जंतुकीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात काढले गेलेले नाहीत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नसलेल्या गावातील सुमारे ६१८ माध्यमिक शाळा शुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण पट १ लाख ७ हजार २८५ इतका असून प्रत्यक्षात उपस्थिती मात्र केवळ ६२ हजार १६५पर्यंत आहे. यावरून अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. त्यातच मुलांच्या आरोग्याविषयी सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही प्रयत्न होत नसल्याने काही ठिकाणी शाळांची घंटा वाजली असली मुलांच्या आरोग्याच्या काळजीमुळे अजूनही अनेक विद्यार्थी शाळांपासून दूर आहेत.

--

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली -११७०४५

दुसरी -१२१३४२

तिसरी -१२०६१८

चौथी -१२३९३९

पाचवी -१२२७४३

सहावी -१२०६४५

सातवी -११८३३२

आठवी -११५९१०

नववी -१११४२१

दहावी -९८९४९

जिल्ह्यात ६१८ शाळा सुरू

नाशिक जिल्ह्यात महिनाभराच्या कालावधीत कोरोना संसर्ग नसलेल्या वेगवेगळ्या गावांतील सुमारे ६१८ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण पट १ लाख ७ हजार २८५ इतका आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ६२ हजार १६५ विद्यार्थीच शाळांमध्ये उपस्थित राहत असून अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांमध्ये उत्सुकता दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

--

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

कोरोना संसर्ग नसलेल्या भागात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने स्थानिक शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत. परंतु, शाळा सुरू करताना वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण व विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे.

--

तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच

शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यासाठी येणाऱ्या खर्चाविषयी शासनाने लिखित स्वरूपात कोणतेही आदेश अथवा सूचना शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळांचे निर्जंतुकीकरणासह अन्य उपाययोजनांसाठी येणारा खर्च कोणत्या निधीतून करावा असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

---

शिक्षणाधिकारी काय म्हणतात?

कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा हळूहळू सुरू होत आहेत. त्यासाठी शाळांनी मागील वर्षाप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने स्थानिक स्तरावर नियोजन केले जात आहे. परंतु काही ठिकाणी शाळा सुरू होऊनही गावात रुग्ण आढळल्याने शाळा बंद कराव्या लागत असून यासंदर्भातील निर्णय मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक स्तरावर घेणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.