शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

राज्यातील एक लाखाहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:21 IST

संजय दुनबळे। नाशिक : राज्यातील एक लाख २१ हजार ६०९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाकडून शिष्यवृती मंजूर झाली असून, सर्वाधिक ...

ठळक मुद्देत्रुटींमुळे १३०० प्रकरणे रद्द : १२ हजार प्रस्ताव महाविद्यालयांकडे प्रलंबित

संजय दुनबळे।नाशिक : राज्यातील एक लाख २१ हजार ६०९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाकडून शिष्यवृती मंजूर झाली असून, सर्वाधिक संख्या नाशिक विभागातील (१६,४०३) विद्यार्थ्यांची आहे. विविध प्रकारच्या त्रुटींमुळे १३१० प्रस्ताव विभागाने रद्द केले आहेत, तर १२ हजार २३२ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांकडे अद्याप प्रलंबित आहेत.राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागविले जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात आदिवासी विभागाच्या राज्यभरातील एकूण ३० विभागांमधून एक लाख ६९ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ३२ हजार ०६९ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आदिवासी विभागाकडे पाठविण्यात आले होते. आदिवासी विभागाने केलेल्या छाननीत एक लाख २४ हजार ५६६ विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. अंतिम टप्प्यापर्यंत १८,१९५ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज माघारी घेतले. तर ७ हजार ५०३ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप आदिवासी विभागाकडे प्रलंबित आहेत. तर १३१० प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ते प्रस्ताव आदिवासी विभागातर्फे रद्दबातल ठरविले, तर ६०१८ प्रस्ताव महाविद्यालयांकडे परत पाठविण्यात आले आहेत. एक लाख २१ हजार ६०९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम महाडीबीटीमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. आतापर्यंत शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला असून, दुसरा हप्ता लवकरच जमा होणार आहे.१६,४०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीनाशिक विभागातून तब्बल २२,४६२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. महाविद्यालयीन स्तरावर १८,४५३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. तर आदिवासी विभागाने १६,६८५ प्रस्तावांना मंजुरी दिली. १७६८ प्रस्ताव महाविद्यालयांकडे प्रलंबित असून, १५२ विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या. ४५६ प्रस्ताव विभागाने परत पाठविल्याने १६,४०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती