शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

राज्यातील एक लाखाहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:21 IST

संजय दुनबळे। नाशिक : राज्यातील एक लाख २१ हजार ६०९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाकडून शिष्यवृती मंजूर झाली असून, सर्वाधिक ...

ठळक मुद्देत्रुटींमुळे १३०० प्रकरणे रद्द : १२ हजार प्रस्ताव महाविद्यालयांकडे प्रलंबित

संजय दुनबळे।नाशिक : राज्यातील एक लाख २१ हजार ६०९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाकडून शिष्यवृती मंजूर झाली असून, सर्वाधिक संख्या नाशिक विभागातील (१६,४०३) विद्यार्थ्यांची आहे. विविध प्रकारच्या त्रुटींमुळे १३१० प्रस्ताव विभागाने रद्द केले आहेत, तर १२ हजार २३२ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांकडे अद्याप प्रलंबित आहेत.राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागविले जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात आदिवासी विभागाच्या राज्यभरातील एकूण ३० विभागांमधून एक लाख ६९ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ३२ हजार ०६९ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आदिवासी विभागाकडे पाठविण्यात आले होते. आदिवासी विभागाने केलेल्या छाननीत एक लाख २४ हजार ५६६ विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. अंतिम टप्प्यापर्यंत १८,१९५ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज माघारी घेतले. तर ७ हजार ५०३ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप आदिवासी विभागाकडे प्रलंबित आहेत. तर १३१० प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ते प्रस्ताव आदिवासी विभागातर्फे रद्दबातल ठरविले, तर ६०१८ प्रस्ताव महाविद्यालयांकडे परत पाठविण्यात आले आहेत. एक लाख २१ हजार ६०९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम महाडीबीटीमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. आतापर्यंत शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला असून, दुसरा हप्ता लवकरच जमा होणार आहे.१६,४०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीनाशिक विभागातून तब्बल २२,४६२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. महाविद्यालयीन स्तरावर १८,४५३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. तर आदिवासी विभागाने १६,६८५ प्रस्तावांना मंजुरी दिली. १७६८ प्रस्ताव महाविद्यालयांकडे प्रलंबित असून, १५२ विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या. ४५६ प्रस्ताव विभागाने परत पाठविल्याने १६,४०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती