शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१६ हजार घरकुलांची योजना साडेसहा हजारांत गुंडाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:02 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली आदर्श आचारसंहिता संपताच हा विषय मार्गी लागणार आहे.

ठळक मुद्देनेहरू अभियान : आता फक्त साडेसातशे कुटुंबांना मिळणार निवारा

नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली आदर्श आचारसंहिता संपताच हा विषय मार्गी लागणार आहे.केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात शासकीय आणि निमशासकीय भूखंडांवर घरकुल योजना बांधण्याचा महापालिकेने प्रस्ताव तयार केला. त्यावेळी सोळा हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठरविले होते. मात्र, ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे, त्याचठिकाणी योजना राबविण्याचे आदेश असतानाही त्यात केलेले बदल आणि शहराबाहेर चुंचाळे येथे राबविण्यात आलेली सहा हजार घरांची योजनाही वादग्रस्त ठरली त्यातच घरकुल योजना भलत्याच ठिकाणी राबविण्यामुळे तर नागरिकांचा रोषही पालिकेला त्रासदायक ठरला. त्यातून घरकुलांची संख्या कमी कमी होत गेली. आधी सोळा हजार घरे त्यानंतर बारा हजार मग अकरा हजार आणि त्यानंतर ९ हजार ५०० आणि आता साडेसहा हजार घरकुलेच योजनेत देण्यात आली आहेत. ज्या गोरगरिबांच्या नावाखाली महापालिकेने ही योजना राबविली. त्यात मूळ योजनेच्या तीस टक्के रक्कम महापालिकेला खर्च करणे बंधनकारक होते. त्यानुसार खर्च तर झालाच शिवाय भूसंपादनाचा खर्च महापालिकेकडे असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारने निधी देऊनही प्रत्यक्षात महापालिकेला ही योजना अत्यंत महागात पडली, असेही स्पष्ट झाले. घरकुल योजनेतील अनेक गैरव्यवहार तसेच महापालिकेच्या एमआयडीसीचा भूखंड घेताना जादा रक्कम देणे, रद्द झालेली घरकुल योजना पुन्हा राबविणे असे अनेक प्रताप प्रशासनाने केले. परंतु अव्वाच्या सव्वा रक्कम देऊनदेखील महापालिका हद्दीतील किमान शासकीय आणि निमशासकीय भूखंडेही झोपडपट्टीमुक्त होऊ शकली नाही आणि गंजमाळसारख्या ठिकाणी तर झोपडपट्ट्या तोडल्या आणि घरकुल योजनाही राबविली गेली नाही, असा प्रकार घडला. घरकुलात खरे लाभार्थी किती?महापालिकेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आल्यानंतर पालिकेने संबंधित झोपडपट्टी असलेला परिसर मोकळा करून त्याला कुंपण घालणे बंधनकारक होते. परंतु घरकुल योजनेत घरे घेऊन प्रत्यक्षात पुन्हा झोपडपट्टीत जाऊन राहणारेदेखील सापडले असून, त्यामुळे ही योजना खरोखरच यशस्वी झाली काय या विषयीच शंका व्यक्त केली जात आहे.