शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अवर्षणग्रस्त  सिन्नर तालुक्यात चंदन शेतीचा  सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:21 IST

अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्‍यानी चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करण्याचे धाडस दाखविले आहे. पारंपरिक पिकांवर उपजीविका सुरू ठेवण्यासोबतच जोड शेती म्हणून चंदनशेतीचा पर्याय शेतकर्‍यानी निवडला आहे. कृषिधन, फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती उत्पादक सहकारी सोसायटीच्या पुढाकारातून तालुक्यात सुमारे ५० एकरावर चंदनशेती बहरली आहे.

शैलेश कर्पेअवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्‍यानी चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करण्याचे धाडस दाखविले आहे. पारंपरिक पिकांवर उपजीविका सुरू ठेवण्यासोबतच जोड शेती म्हणून चंदनशेतीचा पर्याय शेतकर्‍यानी निवडला आहे. कृषिधन, फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती उत्पादक सहकारी सोसायटीच्या पुढाकारातून तालुक्यात सुमारे ५० एकरावर चंदनशेती बहरली आहे.  सिन्नर तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती राहिल्याने शेतकºयांसाठी शेती आतबट्ट्याची ठरत आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे केले पाहिजे या भावनेतून सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी उजनी येथील युवा शेतकरी राम मोहन सुरसे यांनी चंदनशेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कन्हैयालाल भुतडा, विजय शिंदे, बाळासाहेब कासार या शेतकर्‍यासोबत सुरसे यांनी कर्नाटक, तामिळनाडू येथे जाऊन चंदनाची शेती व चंदनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची माहिती घेतली. सुमारे दोन आठवड्यांचा अभ्यास दौरा केला. या दौर्‍यात सुरसे यांच्यासह शेतकर्‍यानी चंदनावर काम करणारे बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट आॅफ वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमधील संशोधक डॉ. श्याम विश्वनाथ यांच्यासोबत चर्चा करून चंदनाच्या शेतीची माहिती घेतली. त्यानंतर फॉरेस्ट कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, तामिळनाडू येथे भेट देत प्रत्यक्ष शेती करणाºया शेतकर्‍यासोबत संवाद साधून चंदनशेतीचे तंत्र जाणून घेतले. त्यानंतर सुरसे यांच्यासह शेतकर्‍यानी एकत्र येऊन सिन्नर तालुक्यात चंदनशेती करण्याचा निर्णय घेतला. कृषिधन फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती सहकारी संस्थेची स्थापना केली. सुमारे दीड वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यात सुमारे २५ एकरावर चंदनाची लागवड करण्यात आली. आज तालुक्यातील सुमारे १५ शेतकर्‍यानी ५० एकरावर चंदनशेती फुलवली आहे. शासनाने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानही देऊ केले आहे.राम सुरसे या युवा शेतकºयाने सुमारे तीन एकरावर एक हजार चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी लागवड केलेली झाडे पाहण्यासाठी आत्तापर्यंत सुमारे ५००हून अधिक शेतकºयांनी सुरसे यांच्या शेतीला भेट दिली आहे. चंदन हे परावलंबी आहे म्हणून ते जमिनीतून नायट्रोजन आणि फॉस्फरस घेऊ शकत नाही. परंतु ते शेजारच्या झाडांचे मुळापासून नायट्रोजन आणि फॉस्फरसघेते. त्यामुळे सुरसे यांनी त्यांच्या शेतात चंदनाच्या लागवडीसोबतच एक हजार यजमान (होस्ट ट्री) म्हणून मिलचाहुबा हे झाड लावले आहे.आता त्यांच्या चंदनशेतीने चांगलेच बाळसे  धरले आहे. बारा वर्षांनंतर चंदनाच्या  शेतीचे उत्पन्न मिळण्यास प्रारंभ होतो. सुमारे ६ ते ७ वर्ष ठिबकद्वारे झाडांना पाणी द्यावे लागते. त्यानंतर पाणी देण्याची गरज भासत  नाही. ७ वर्षांनंतर झाडांच्या संरक्षणाची गरज भासते.राष्टÑीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटकांमध्ये चंदनाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात महाराष्टÑ फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ कार्यालयामार्फत समूह पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्यनिर्मिती, औषधी वनस्पती लागवड, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. चंदनशेतीला शासनाकडून अनुदान दिले जाते.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी