शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पाऊस लांबल्याने टंचाईचे सावट

By admin | Updated: June 24, 2014 00:34 IST

नाशिक : मान्सूनने केवळ नावालाच हजेरी लावल्याने शहर व जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक : मान्सूनने केवळ नावालाच हजेरी लावल्याने शहर व जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी (दि.२५) यासंदर्भात तातडीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बोलविली आहे.सोमवारी मुख्यालयात सुखदेव बनकर यांनी खातेप्रमुखांची नियमित आढावा बैठक घेतली. त्यात आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने आचारसंहितेत कोणतीही विकासकामे अडकू नयेत, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत त्यांनी खातेप्रमुखांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी आचारसंहितेपूर्वीच लाभार्थ्यांची निवड करावी. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीतून विकासकामे ही आचारसंहितेपूर्वीच सुरू केली जावीत. त्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घ्यावी, अशा सूचना त्यांनी खातेप्रमुखांना दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून, तेथे तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा योजनांबाबत, तसेच पाणी उपलब्ध करून देण्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील, याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी व नियोजन करण्यासाठी बुधवारी (दि.२५) त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा संदर्भात निगडित असलेल्या सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते पाणी टंचाईवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चर्चा करणार आहेत.(प्रतिनिधी)