शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

टंचाई प्रस्ताव फेटाळले

By admin | Updated: June 1, 2017 01:04 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते.

 लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते. तरीही जलयुक्तचे काम झालेल्या गावांनाच पाणीटंचाईने ग्रासले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच की काय तालुक्यातून आलेले टंचाई प्रस्ताव फेटाळण्याकडे प्रशासनाचा कल आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये प्रस्तावित कामे एकूण ८२६ होती. मात्र प्रत्यक्षात ८२९ कामे पूर्णत्वास आली. सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावित कामे २३२ होती प्रत्यक्षात १५७ पूर्ण झालीत.तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी एकूण १८ गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भागओहळ, वेळे, गणेशगाव (वा), हिर्डी, मुरंबी, गावठा, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (ह), खरशेत कळमुस्ते (ह), ठाणापाडा, कळमुस्ते (त्र्यं), ब्राह्मणवाडे, मुळेगाव, सामुंडी , देवगाव व टाके देवगाव. सन २०१६-१७ करिता जलयुक्त शिवारकरिता एकूण ९ गावांची निवड करण्यात आली होती. ती गावे अशी-खडकओहळ, शिरसगाव (ह), नांदुरकी पाडा, कडेगव्हाण, चिखलपाडा, गोलदरी, गडदवने, बोरीपाडा व ओझरखेड या गावांमधील २३२ प्रस्तावित कामांपैकी १५७ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ७५ कामे जूनअखेर पूर्ण होतील, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिला. तेथील विहिरीने तळ गाठला आहे. वयोवृध्द महिला तसेच लहान मुली तर काही पुरु ष मंडळी यांची पाणी आणतांना अक्षरश: दमछाक होत असते. सरकारी नियम आहे की, २ ते ३ कि.मी. परिसरात पाणी असले तर टँकर द्यायचा नाही. असे समीकरण ठरलेले असते. विहिरींनी तळ गाठला असो., की दूषित पाणी असो.शक्य तो टँकरचा प्रस्ताव नाकारण्याकडे प्रशासनाचा कल असतो. तर मग जलयुक्त शिवारची कामे होऊनही उपयोग होत नसेल तर काय उपयोग, असा सवाल विचारला जात आहे. आणि जलयुक्तचे हेच अपयश झाकण्यासाठी तालुक्यातील असे प्रस्ताव नामंजूर करण्यात येतात. म्हणजेच आमच्या तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे झाल्याने तालुका पाण्याच्या बाबतीत आलबेल आहे, असा संदेश पोहचला पाहिजे.