शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

टंचाई प्रस्ताव फेटाळले

By admin | Updated: June 1, 2017 01:04 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते.

 लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते. तरीही जलयुक्तचे काम झालेल्या गावांनाच पाणीटंचाईने ग्रासले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच की काय तालुक्यातून आलेले टंचाई प्रस्ताव फेटाळण्याकडे प्रशासनाचा कल आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये प्रस्तावित कामे एकूण ८२६ होती. मात्र प्रत्यक्षात ८२९ कामे पूर्णत्वास आली. सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावित कामे २३२ होती प्रत्यक्षात १५७ पूर्ण झालीत.तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी एकूण १८ गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भागओहळ, वेळे, गणेशगाव (वा), हिर्डी, मुरंबी, गावठा, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (ह), खरशेत कळमुस्ते (ह), ठाणापाडा, कळमुस्ते (त्र्यं), ब्राह्मणवाडे, मुळेगाव, सामुंडी , देवगाव व टाके देवगाव. सन २०१६-१७ करिता जलयुक्त शिवारकरिता एकूण ९ गावांची निवड करण्यात आली होती. ती गावे अशी-खडकओहळ, शिरसगाव (ह), नांदुरकी पाडा, कडेगव्हाण, चिखलपाडा, गोलदरी, गडदवने, बोरीपाडा व ओझरखेड या गावांमधील २३२ प्रस्तावित कामांपैकी १५७ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ७५ कामे जूनअखेर पूर्ण होतील, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिला. तेथील विहिरीने तळ गाठला आहे. वयोवृध्द महिला तसेच लहान मुली तर काही पुरु ष मंडळी यांची पाणी आणतांना अक्षरश: दमछाक होत असते. सरकारी नियम आहे की, २ ते ३ कि.मी. परिसरात पाणी असले तर टँकर द्यायचा नाही. असे समीकरण ठरलेले असते. विहिरींनी तळ गाठला असो., की दूषित पाणी असो.शक्य तो टँकरचा प्रस्ताव नाकारण्याकडे प्रशासनाचा कल असतो. तर मग जलयुक्त शिवारची कामे होऊनही उपयोग होत नसेल तर काय उपयोग, असा सवाल विचारला जात आहे. आणि जलयुक्तचे हेच अपयश झाकण्यासाठी तालुक्यातील असे प्रस्ताव नामंजूर करण्यात येतात. म्हणजेच आमच्या तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे झाल्याने तालुका पाण्याच्या बाबतीत आलबेल आहे, असा संदेश पोहचला पाहिजे.