शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

वीजमीटरचा तुटवडा; म्हणे नादुरुस्त मीटर बदला मुख्य अभियंताही अनभिज्ञ : व्यवस्थापकीय संचालक म्हणतात, राज्यात मीटर पुरेसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:02 IST

नाशिक : वीजहानी कमी करण्याबरोबरच महसुलात वाढ करण्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याचे आदेश खुद्द महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत.

ठळक मुद्देनवीन वीजमीटर देण्याचे आदेश आपल्या अभियंत्यांना दिले एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये ग्राहकांच्या वीजवापरात वाढ

नाशिक : वीजहानी कमी करण्याबरोबरच महसुलात वाढ करण्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याचे आदेश खुद्द महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असले, तरी शहरात वीजमीटर शिल्लकच नसल्याने अनेक उपकार्यालयांमध्ये नवीन वीजमीटरचे अर्ज महिनाभरापासून पडून आहेत. याबाबतची माहिती मुख्य अभियंत्यांनादेखील नसल्यामुळे त्यांनीही नवीन वीजमीटर देण्याचे आदेश आपल्या अभियंत्यांना दिले आहेत. येत्या तीन महिन्यांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजवापर वाढणार असल्याने येत्या महिनाभराच्या आत ग्राहकांचे नादुरुस्त वीजमीटर बदलावेत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना त्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये ग्राहकांच्या वीजवापरात वाढ होते. या काळात अचूक बिलिंग करून वसुली वाढविण्यासाठीचे अचूक काम केल्यास महावितरणची आर्थिक घडी सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचे संजीवकुमार यांचे म्हणणे आहे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. यापुढे ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येतील असे व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात शहरात वीजमीटर शिल्लकच नसल्याने शहरातील अनेक कक्ष कार्यालयांमध्ये वीजमीटरसाठी ग्राहकांना रोज चकरा माराव्या लागत आहेत. वीजमीटरची नोंदणी करण्यात आली असून, महिनाभरात वीजमीटर येतील तेव्हा मागणी यादीनुसार वीजमीटर लावले जातील अशी उत्तरे कनिष्ठ अभियंते देत असताना, मुख्य अभियंत्यांना शहरातील वीजमीटर्सची माहिती नसल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. शहरातील इंदिरानगर कक्ष कार्यालयाकडे वीजमीटर नसल्यामुळे तर ग्राहकांना रोजच चकरा माराव्या लागत आहेत. यातून कनिष्ठ अभियंता आणि ग्राहकांमध्ये अनेकदा वादाचेही प्रसंग उद्भवतात. असे असतानाही मुख्य अभियंत्यांनी मात्र कनिष्ठ अभियंत्यांच्या अडचणी समजून न घेता वीजमीटर देण्याचे आदेश आपल्या अभियंत्यांना दिल्याने कनिष्ठ अभियंत्यांपुढेच प्रश्न उभा राहिला आहे.