शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जलवाहिनीतील पाणीचोरीमुळे टंचाई

By admin | Updated: March 24, 2017 23:42 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे.

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून देशवंडी येथे पाणी पोहोचत नसल्याने व तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.देशवंडी, जायगाव, वडझिरे, मोह, चिंचोली आदि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या योजनेतील शेवटच्या व उंचावर असलेल्या देशवंडीकरांना गेल्या महिनाभरापासून पाणीच मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट वाढली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप गेल्या दोन महिन्यापासून या वाढत्या चोऱ्यांमुळे नायगाव व देशवंडी येथील जलकुंभापर्यंत मुख्य जलवाहिनीचा दाब कमी झाल्याने पाणी पोहोचत नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण होत आहे. मोह येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून नायगाव येथील पंपिंगपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीतून अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या पाणीचोरीमुळे ही योजना ऐन उन्हाळ्यात कुचकामी ठरत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वा वाढत्या चोऱ्या थांबवून नायगाव व देशवंडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देशवंडी व नायगाव येथील महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)या योजनेद्वारे मिळणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक-पुणे महामार्गाच्या कामामुळे या योजनेला चेहडी येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे वारंवार घडत असल्याने ही योजना अधून मधून बंद होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या मुख्य जलवाहिनीतूनच पाणीचोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नायगाव ते देशवंडी येथील या योजनेचे जलकुंभ पूर्णक्षमतेने भरले जात नसल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे.