शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई कृती आराखड्याची टॅँकरवरच भिस्त !

By admin | Updated: March 22, 2017 01:25 IST

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नऊ कोटी रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांतील अनेक कामांपैकी एकही काम सुरू होऊ शकले नसल्यामुळे यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात पाण्याच्या टंचाईबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाजही फोल ठरल्याने नजीकच्या काळात कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ या कालावधीसाठी तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यात उपाययोजनांतील नऊ कामे सुचविली असून, सरतेशेवटी टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची टंचाई फारशी भासणार नसल्याचा अंदाज अगोदरपासूनच व्यक्त केला जात होता, मात्र तरीही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४५८ गावे व ७४८ वाड्यांच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सव्वा नऊ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला. तथापि, आॅक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात अपेक्षित असलेले एकही काम सुरू होऊ शकले नाही. जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात २४९ गावे व ३६३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसाविण्याची शक्यता व्यक्त करून प्रगतीतील नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती योजना, तात्पुरती पूरक नळ योजना, विशेष दुरुस्ती, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे यांसारखी कामे कृती आराखड्यात समाविष्ट केली. मात्र यापैकी एकही काम या तीन महिन्यांत सुरू होऊ शकलेले नाही किंबहुना पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही सादर केला नाही. उलटपक्षी बागलाण व मालेगाव तालुक्याला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाला पाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला. ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तेथे एकही उपाययोजना केली नाही.मार्चअखेर उन्हाचा वाढलेला तडाखा पाहता, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मागणी आणखी वाढणार असली तरी, सद्यस्थितीत टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच भर दिला जाण्याची चिन्हे आहेत.