शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई कृती आराखड्याची टॅँकरवरच भिस्त !

By admin | Updated: March 22, 2017 01:25 IST

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नऊ कोटी रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांतील अनेक कामांपैकी एकही काम सुरू होऊ शकले नसल्यामुळे यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात पाण्याच्या टंचाईबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाजही फोल ठरल्याने नजीकच्या काळात कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ या कालावधीसाठी तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यात उपाययोजनांतील नऊ कामे सुचविली असून, सरतेशेवटी टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची टंचाई फारशी भासणार नसल्याचा अंदाज अगोदरपासूनच व्यक्त केला जात होता, मात्र तरीही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४५८ गावे व ७४८ वाड्यांच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सव्वा नऊ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला. तथापि, आॅक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात अपेक्षित असलेले एकही काम सुरू होऊ शकले नाही. जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात २४९ गावे व ३६३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसाविण्याची शक्यता व्यक्त करून प्रगतीतील नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती योजना, तात्पुरती पूरक नळ योजना, विशेष दुरुस्ती, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे यांसारखी कामे कृती आराखड्यात समाविष्ट केली. मात्र यापैकी एकही काम या तीन महिन्यांत सुरू होऊ शकलेले नाही किंबहुना पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही सादर केला नाही. उलटपक्षी बागलाण व मालेगाव तालुक्याला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाला पाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला. ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तेथे एकही उपाययोजना केली नाही.मार्चअखेर उन्हाचा वाढलेला तडाखा पाहता, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मागणी आणखी वाढणार असली तरी, सद्यस्थितीत टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच भर दिला जाण्याची चिन्हे आहेत.