शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

नाशिक महापालिकेत घोटाळेच घोटाळे अन्‌ चौकशाच चौकशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

आरोप खूप; परंतु निष्कर्ष निघेना संजय पाठक, नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागू पडणार नाही. ...

आरोप खूप; परंतु निष्कर्ष निघेना

संजय पाठक, नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागू पडणार नाही. मात्र, चौकशी समिती नियुक्त केली की घोटाळे थांबणारच आहेत, अशा आविर्भावात समित्या नियुक्त केल्या जात आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्याच महासभेत टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी आणखी एक समिती गठित केली आहे. मात्र, या चौकशीतून खरोखरच काही गांभीर्य बाहेर पडेल की केवळ वेळ घालवण्याचा प्रकार घडेल, हे लवकर स्पष्ट होईलच. नाशिक महापालिकेत सध्या कोरोनामुळे अन्य विषय गाजत नसले तरी भूखंड, आरक्षण, भूसंपादन आणि त्यासाठी दिले जाणारे मोबदले हे अत्यंत प्राधान्याचे विषय ठरले आहेत. त्याचबरोबर जुन्या प्रकरणातील मोबदल्यातील घाेळ हे देखील उघडकीस येत असल्याने सध्या महापालिकेत कोराेनासारख्या संकटापेक्षा भूखंड मोबदले आणि घोटाळे यांचीच चर्चा आहे. मध्यंतरी देवळाली येथील एका आरक्षित भूखंडाच्या मोबदल्यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा टीडीआर मोबदला चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप झाला. मात्र, हे आरोप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केले. त्यातील शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी राज्यात सत्ता असल्याने आपल्याच पक्षाच्या नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली आणि त्यांनी महापालिकेला तातडीने चौकशी करण्यास सांगितले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या ॲड. शिवाजी सहाणे यांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांनी देखील चौकशी आरंभली आहे. त्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी दाेन अधिकाऱ्यांकडून देखील चौकशीचे कामकाज सुरू केले आहे. म्हणजेच एकाच प्रकरणासाठी चार चौकशांचे काम सुरू आहे. त्यातून निष्कर्ष काय लागेल, हे मात्र सांगणे कठीण आहे.

याच नव्हे तर नाशिक महापालिकेत अशा अनेक प्रकरणांसंदर्भात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काही भूखंडांचे मालक नसलेल्यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला रोखत आणि काही वेळा टीडीआर स्वरूपात देण्यात आला आहे, तर काही प्रकरणात रिक्त भूखंड नसताना जमीनमालक माेबदला लाटून बसला आणि भूखंडच महापालिकेच्या नावावर नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक घोटाळ्यांसाठी गेल्याच आठवड्यात झालेल्या महासभेत महापौरांनी एक समिती घोषित केली. त्यात लोकप्रतिनिधींचा देखील समावेश केला आहे. प्रकरणांच्या चौकशीचा नक्की स्कोप नसल्याने एकूणच या समितीच्या माध्यमातून काय बाहेर पडेल, हे स्पष्ट होणे कठीण आहे. परंतु, अशा घाऊक चौकशांमधून फार काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. त्यातच आता वर्षभरावर निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे समित्यांना प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद, उपलब्ध होणारी कागदपत्रे या सर्वांचा विचार केला तर समिती कितपत तग धरेल हे सांगता येत नाही. त्यातच आजवर महापालिकेत कोणत्याही भूखंड घोटाळ्याच्या तळापर्यंत कोणीच गेलेले नाही की तसे काही अंतिमत: निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे चाैकशी समिती नावालाच राहू नये व चौकशी समितीचा भोकाडा दाखवण्यासाठी उपयोग होऊ नये इतकेच.