शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांवर संक्रांत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:34 IST

झारखंड येथे आधार क्रमांक रेशनकार्डाला लिंक नसल्याच्या कारणावरून धान्य नाकारण्यातून भूकबळीमुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची दखल घेत केंद्र सरकारने आधारशिवायही रेशनमधून धान्य देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्या तरी, जिल्ह्णातील सव्वादोन लाख कुटुंबांची अद्याप आधार जोडणी झालेली नाही. या जोडणीसाठी आठ ते नऊ महिने लागणार असल्याने नजीकच्या काळात या कुटुंबांना धान्य मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : झारखंड येथे आधार क्रमांक रेशनकार्डाला लिंक नसल्याच्या कारणावरून धान्य नाकारण्यातून भूकबळीमुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची दखल घेत केंद्र सरकारने आधारशिवायही रेशनमधून धान्य देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्या तरी, जिल्ह्णातील सव्वादोन लाख कुटुंबांची अद्याप आधार जोडणी झालेली नाही. या जोडणीसाठी आठ ते नऊ महिने लागणार असल्याने नजीकच्या काळात या कुटुंबांना धान्य मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकाने त्याच्या शिधापत्रिकेवर नाव असलेल्या सर्व व्यक्तींचे आधारक्रमांक पुरवठा खात्याकडे देऊन ते शिधापत्रिकेशी  लिंक केल्याशिवाय धान्य देऊ नये, असे आदेश मे महिन्यातच जारी केले होते. त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांनी आपल्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक गोळा करून ते पुरवठा खात्याच्या ताब्यात दिले होते.  रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आधार गोळा करून दिलेले असतानाही त्यापैकी एक ते दोनच व्यक्तींचे आधार जोडणी करून अन्य व्यक्तींची जोडणी केलेलीच नाही. अखेर ठेकेदाराने काम पूर्ण न करताच देयके घेऊन गाशागुंडाळला आहे. आधार जोडणीसाठी होणारा विलंब पाहता शासनाने सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली व त्यानंतर आता जानेवारी महिन्यापर्यंत आधार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे दुकानदारांनी गोळा केलेल्या आधारची माहिती पुरवठा खात्याकडे सुपुर्द करण्यात आली, परंतु जिल्ह्णातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांची जोडणी बाकी आहे. या कामासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने जानेवारी महिन्यापासून आधार नसल्यास धान्य देणे बंद करण्याचे ठरविले तर सव्वादोन लाख कुटुंबांना त्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंक करण्यासाठी शासनाने नाशिक जिल्ह्णासाठी ६० लाख रुपयांची तरतूदही केली. पुरवठा खात्याने या कामासाठी ठेकेदाराची नेमणूक केली व प्रतिकार्डामागे पाच रुपये ६२ पैसे इतक्या दराने कामाचा ठेका दिला होता. ठेकेदाराने सप्टेंबर महिन्यात संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण न करताच गाशा गुंडाळला. पुरवठा खात्याने सदर ठेकेदाराला आजवर जवळपास २१ लाखांच्या आसपास रक्कम आजवर अदा केली असली तरी, प्रत्यक्षात ठेकेदाराने काम पूर्ण केलेलेच नाही. ज्या कामांचे देयके त्याला अदा करण्यात आले, ते कामदेखील त्याने परिपूर्ण केलेले नाही.