शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

हिंदू तिथीनुसार प्रथमच सावरकर जयंती साजरी

By admin | Updated: May 22, 2014 00:15 IST

नाशिक : शहरात विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच हिंदू तिथीनुसार वीर सावरकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढे वैशाख कृष्ण षष्ठीला सावरकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : शहरात विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच हिंदू तिथीनुसार वीर सावरकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढे वैशाख कृष्ण षष्ठीला सावरकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या सावरकरांची जयंती हिंदू तिथीनुसारच साजरी केली जावी, यासाठी इतिहासाचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शहरातील संस्थांना आवाहन केले होते. त्यानुसार प्रथमच ठिकठिकाणी हिंदू तिथीनुसार सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. भगूर येथे सावरकरांच्या जन्मस्थानी सावरकर जन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने मृत्यंुजय कापसे, सुनील जाधव, विलास कुलकर्णी, कैलास गायकवाड, संजय जाधव यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. द्वारका परिसरातील काठेगल्ली चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते सदूभाऊ वालझाडे व कीर्तीश जोशी यांनी सावरकर साहित्याचे पूजन केले. यावेळी मनोहर साठे, लक्ष्मीकांत जोशी, डॉ. विशाल वाघचौरे, बजरंग दलाचे सतीश हाके, राहुल सोनकुळ, साई पतंगे, नारायण निकम, संजय कुलकर्णी आदि उपस्थित होते. मध्य नाशिकमधील ऐतिहासिक अभिनव भारत स्मारक मंदिरात भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, शिवसेना उपमहानगरप्रमुख नीलेश कुलकर्णी, नगरसेवक शाहू खैरे, हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी भगूरचे जन्मस्थान व अंदमानातील कारागृहातून आणलेल्या पवित्र मातीचे पूजन केले. यावेळी संजय काशीकर, स्वानंद कुलकर्णी, जयवंत गद्रे, विष्णू बागुल, नितीन काथवटे आदि उपस्थित होते. रविवार कारंजा येथे भूषण रुईकर, मनीष रेवर, नारायण चुंबळे, महेश बडवे, जयेश परमार, दीपक कपिले, स्वप्नील गिते यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. पंचवटी कारंजावर परशुराम जयंती उत्सव समितीचे शिवाजी पालकर, सचिन पाडेकर, राहुल केंगे, रोहित मुळे, अनंत कोरडे, भूषण पाठक, चंद्रशेखर पंचाक्षरी, किरण पाटील यांनी सावरकर व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विसंगती दूर व्हावीसावरकरांचा जन्म १३१ वर्षांपूर्वी भगूर येथे वैशाख कृष्ण षष्ठीला झाला. सावरकरांनी आयुष्यभर हिंदुत्व रक्षणाचा ध्यास घेतला व हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगला. मात्र त्यांची जयंती व पुण्यतिथी पाश्चिमात्य कालगणनेतल्या तारखांनुसार केली जाते. त्यांच्या शिकवणुकीशी विसंगत असा हा प्रघात आहे. ही विसंगती दूर व्हावी व हिंदू तिथीप्रमाणेच त्यांची जयंती साजरी केली जावी, यासाठीच हे अभियान राबविले जाणार आहे.- नंदन रहाणे, इतिहास अभ्यासक