शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

समाधानकारक पावसाने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात ...

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात केल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने, शेतीची कामे काहीशी संथगतीने सुरू आहेत. वेळेत मजूर न मिळाल्यास भात लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता बळीराजा करत आहे. म्हणून घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून आवणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह परिसरातील वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून, मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी देवगांव परिसरातील वाडीपाड्यांमधील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. मजुरांचा दरदिवसाला २५० रुपये रोज होता, परंतु लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये रोजाने मजुरांची मजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजुरी वाढल्याने हवालदिल झाला असून, घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीची कामांवर जोर दिला आहे. देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम, एक हजार आठ, रूपाली, सोनम, एक हजार दप्तरी या भातांच्या वाणांची लागवड केली जाते.

इन्फो

भाताची रोपे तयार

उशिरा, पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. मात्र, भात लावणीसाठी मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापड्यांत लावणीच्या कामांना वेग आला असून, भाताची रोपे तयार झाली आहेत. भातशेती लागवडीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतल्याने विहंगम दृश्य शिवारात पाहायला मिळत आहे.

कोट....

बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, आता काहीसा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर लावणीचे काम हाती घेतले आहे.

- खंडू देहाडे, शेतकरी, अस्वलीहर्ष