शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसाने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात ...

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात केल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने, शेतीची कामे काहीशी संथगतीने सुरू आहेत. वेळेत मजूर न मिळाल्यास भात लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता बळीराजा करत आहे. म्हणून घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून आवणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह परिसरातील वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून, मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी देवगांव परिसरातील वाडीपाड्यांमधील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. मजुरांचा दरदिवसाला २५० रुपये रोज होता, परंतु लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये रोजाने मजुरांची मजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजुरी वाढल्याने हवालदिल झाला असून, घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीची कामांवर जोर दिला आहे. देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम, एक हजार आठ, रूपाली, सोनम, एक हजार दप्तरी या भातांच्या वाणांची लागवड केली जाते.

इन्फो

भाताची रोपे तयार

उशिरा, पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. मात्र, भात लावणीसाठी मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापड्यांत लावणीच्या कामांना वेग आला असून, भाताची रोपे तयार झाली आहेत. भातशेती लागवडीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतल्याने विहंगम दृश्य शिवारात पाहायला मिळत आहे.

कोट....

बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, आता काहीसा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर लावणीचे काम हाती घेतले आहे.

- खंडू देहाडे, शेतकरी, अस्वलीहर्ष