शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उंबरदरीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:17 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाची क्षमता ४८ दशलक्ष घनफूट इतकी असून, धरणातून जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा ही बारमाही चालणारी तालुक्यातील एकमेव योजना आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाणही या भागात मोठ्या प्रमाणात होते. शेतकºयांनी आपल्या शेतात हरभरा, गहू, कांदे, मका आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतलेली असून, ती पिके आता काढणीसाठी येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ठाणगाव, पाडळी येथील शेतकºयांनी सिन्नर येथील लघु पाटबंधारे विभागात संपर्ककरून पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्या आदेशाने लघुपाटबंधारे नंबर दोनचे शाखाधिकारी बी. डब्ल्यू. बोडके यांनी ठाणगाव व पाडळीच्या शेतकºयांसाठी उंबरदरी धरणातून पाच दशलक्ष घनफूट पाणी रब्बी पिकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आवर्तनामुळे बळीराजा सुखावला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक