शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सटाण्यात कांद्याला ११११ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:20 IST

सटाणा : येथील बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : येथील बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे. बुधवारी (दि.२६) उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक ११११ रु पये भाव मिळाला. दरम्यान पावसामुळे यंदा पावसाळी कांद्याची लागवड देखील उशीरा झाल्यामुळे उन्हाळ कांद्याचे दर दीड हजारी ओलांडण्याची शकता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे उत्पादनातही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याची साठवणूक करूनही तो माती मोल भावाने विकावा लागत आहे. कांद्याचे दर खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे.मात्र यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन सरासरी एवढे असले तरी कर्नाटक ,मध्यप्रदेश ,राज्यस्थान या राज्यांसोबातच महाराष्ट्रात पावसाळा तब्बल दीड महीना लेट झाल्यामुळे पावसाळी कांद्याची लागवड देखील उशिराने झाली. परिणामी उन्हाळ कांद्याच्या मागणीत वाढ होऊन आवकेत मात्र घट झाल्याने गेल्या दोनच दिवसात उन्हाळ कांद्याच्या भावात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सटाणा बाजार समिती आवारात साडे चारशे वाहनातून सरासरी बारा हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक होती.आज सर्वाधिक ११११ रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला.तर कमीत कमी साडे तीनशे व सरासरी ९५० रु पयांनी कांदा विकला गेला.  डाळिंबाचे दर घसरलेतेल्या रोगाच्या आक्र मणामुळे डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादे पट्यात डाळिंबाच्या क्षेत्रात तब्बल ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनातही घट झाली आहे. असे असतांना डाळिंब कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी सटाणा बाजार समिती आवारात डाळिंबाच्या साडे चार हजार क्र ेट इतकी आवक होती.भगव्या डाळिंबाने भावात प्रती किलो शंभरी ओलांडून १०५ रु पये भाव मिळविला. मात्र चार दिवसात डाळिंबाची आवक दोन हजार क्र ेट ने वाढल्याने भाव निम्म्याने घसरले आहेत. बुधवारी ६२०० क्र ेट इतकी आवक होती. प्रती किलो सर्वाधिक ६२ भाव मिळाला तर सरासरी ४०रु पये भाव मिळाला .शेतकऱ्यांनी डाळिंब विक्र ीसाठी आणतांना प्रतवारी करूनच आणावा असे आवाहन सभापती रमेश देवरे ,सचिव भास्करराव तांबे यांनी केले आहे. जुलै व आॅगष्ट या दोन मिहन्यात कांदा विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान नुकतेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले असून लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सटाणा सहाय्यक निबंधक कार्यालय व सटाणा बाजार समिती कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव तांबे यांनी केले आहे.