शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सारूळ दगड खाण दंड : सहा महिन्यांचा अल्टिमेटम वसुली फक्त सहा कोटींवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:21 IST

नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले.

ठळक मुद्दे१३ क्रशरचालकांना मार्चअखेर पैसे भरण्याचा तगादा बेकायदेशीर खडीक्रशर सुरू असल्याच्याही तक्रारी

नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे जिल्हा प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले असून, त्यासाठी १३ क्रशरचालकांना मार्चअखेर पैसे भरण्याचा तगादा लावला आहे. ज्या क्रशरची मुदत संपुष्टात आलेली नाही, त्यांना सहा महिन्यांत गाशा गुंडाळण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. नाशिकपासून जवळच व राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या राजूर बहुला, सारूळ या ठिकाणच्या क्रशरचालकांनी दगडाचे उत्खनन करून अख्खा डोंगरच गिळंकृत केला असून, जमिनीखालीदेखील वीस ते पंचवीस फूट त्यामुळे खदान तयार झाली आहे. भुसुरुंगाचा वापर करून दिवस-रात्र दगडांचा उपसा व त्यातून खडी तयार करण्याचे काम करणारे सुमारे दोन डझन क्रशर या ठिकाणी सुरू आहेत. अनेक कारणांनी गाजलेल्या राजूर बहुला व सारूळ येथील खदानीत काही बेकायदेशीर खडीक्रशर सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या सर्व क्रशरचालक व खाणींचे मोजमाप करून त्यांनी व्यवसाय सुरू केल्यापासून रॉयल्टी व त्यावरील दंडाची रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेतला होता व ही रक्कम साडेसहाशे कोटींच्या घरात गेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिजातून रॉयल्टी मिळणार असल्याच्या खुशीत जिल्हा प्रशासन असताना दुसरीकडे खाणीतून उपसा व खडीक्रशरही दोन वर्षांपासून निर्धोक सुरू आहेत. गेल्या महिन्यात गौणखनिज विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांच्या मदतीने या खाणींचे तांत्रिक पद्धतीने मोजमाप करून त्यातून करण्यात आलेला उपसा व प्रत्यक्षात खाणमालकांनी भरलेली रॉयल्टी याचा अंदाज बांधला असून, त्यातील १३ खाण व क्रशरमालकांकडून फक्त सहा कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.