शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सारी, फ्लूचा आठ हजार नागरिकांना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

कोरोनाप्रमाणेच हवेच्या संसर्गातून झपाट्याने पसरणाऱ्या सारी व फ्लू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असली तरी, त्यातल्या त्यात सारीच्या रुग्णांना ...

कोरोनाप्रमाणेच हवेच्या संसर्गातून झपाट्याने पसरणाऱ्या सारी व फ्लू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असली तरी, त्यातल्या त्यात सारीच्या रुग्णांना तीव्र श्वसनाचा गंभीर आजाराचा धोका अधिक आहे, तर फ्लू हा बदलत्या हवामानानुसार दरवर्षी सार्वत्रिक होणारा आजार असल्याचे मानले जात असले तरी, फ्लूमुळेदेखील येणारी शारीरिक कमजोरी सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात अधिक धोकेदायक मानली जात आहे. नाशिक जिल्ह्यात अलीकडेच आरोग्य विभागाने कोरोना वगळता अन्य अजारांनी पीडित असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली. त्यात आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने त्यांची तपासणी केली असता, यातील सुमारे साडेसहाशे रुग्ण सारी या श्वसनाच्या गंभीर आजाराचे असल्याचे समोर आले आहे. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असून, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी व श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे आहेत. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास न्यूमोनिया होण्याचा त्याचबरोबर शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावून धोकेदायक होण्याची शक्यता असते. त्यामानाने फ्लूचा फारसा धोका नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असले तरी, वेळीच त्यावर उपाय होणेही तितकेच गरजेचे असल्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांना फ्लूचा विळखा बसला आहे. सर्दी, खोकला, ताप असे त्याचे स्वरूप असले तरी, कोरोनाप्रमाणेच संसर्गित असलेल्या या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो तसेच सध्या हवेत कोरोनाचे विषाणू असल्यामुळे हा धोका न टाळता येण्यासारखा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चौकट==

लहान, मोठ्यांमध्ये वेगळा व्हायरस

सारी वा फ्लू हे दोघेही हवेतून पसरणारे आजार असले तरी, दोघांचे विषाणू वेगवेगळे आहेत. लहान मुलांसाठी वेगळा व मोठ्या व्यक्तींसाठी वेगळे विषाणू असल्यामुळे या आजारांवर उपचारासाठीदेखील मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देण्यात आली आहेत. विशेषकरून या दोन्ही आजारांमध्ये शारीरिक सक्षमता अधिक महत्त्वाची मानली जाऊन प्रतिजैविकांच्या माध्यमातून त्यावर मात करता येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.