शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यात टॅँकरने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:00 IST

नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर

नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.यंदा मान्सूनचे उशिरा व अपुरे आगमन झाल्याने फक्त ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही नांदगाव, सिन्नर, मालेगाव, देवळा, बागलाण, येवला तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी पावसाळ्यातही राहिली. परिणामी सिन्नर तालुक्यात प्टॅँकरद्वारे पाणीपुरवठयाची वेळ आली. आॅगस्टमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये पाठ फिरविल्यामुळे अन्य तालुक्यांतही पाण्याची मागणी वाढली. विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पाण्याचे स्रोत बंद झाले. जनावरांसाठीदेखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.तीन टॅँकरची भर सध्या जिल्ह्यातील ९५ गावे, २८१ वाडे असे ३७६ गावांसाठी १०१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने बागलाण व मालेगाव तालुक्यातील १२ गावे, ४ वाड्यांसाठी ११ टॅँकर नव्याने मंजूर केले होते. त्यामुळे टॅँकरची संख्या ९८ वर पोहोचली होती. त्यात सोमवारी तीन टॅँकरची भर पडली. पहिल्यांदाच जिल्ह्णात इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.