शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते

By admin | Updated: October 30, 2014 00:06 IST

‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते

नाशिक : शंकराचार्य डॉ़ कूर्तकोटी रचित ‘समत्वगीतम्’ या संस्कृत काव्य पुस्तकात श्रीमद् भगवद्गीतेतील निवडक ३६१ श्लोकांच्या निरूपण असून, त्यांनी त्यातून समता व समरसता हे प्रमुख विचार मांडले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता मंचचे अखिल भारतीय संयोजक भिकूजी इदाते यांनी केले़ गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते़इदाते पुढे म्हणाले की, शंकराचार्यांनी जेव्हा या काव्याची रचना केली तो काळ हा करवट बदलण्याचा कालखंड होता़ देशाला जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवायचे असेल तर परंपरा व चिंतन महत्त्वाचे असून, अनेक संकटे आपण याद्वारे परतवून लावली आहेत़ त्या-त्या कालावधीत झालेल्या महापुरुषांनी समाजाला प्रेरणा दिली़ शंकराचार्यांच्या या पुस्तकातून समत्व, समता आणि समरसता हे गुण पुढे येतात़ याबरोबरच धर्मातील मंत्र व श्लोक याचा अर्थ समरसतेतून शंकराचार्यांनी मांडल्याचे ते म्हणाले़बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद स्वीकारण्याची पंडित मदनमोहन मालवीय यांनी घातलेली गळ, पं़ मोतीलाल नेहरूंची होमरूल चळवळीला आशीर्वाद देण्याची विनंती, लोकमान्य टिळकांनी नाशिक हे कार्यक्षेत्र करण्याची दाखविलेली दिशा, काळाराम मंदिर सत्याग्रहात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले समर्थन, स्वातंत्र्यसेनानी डॉ़ मुंजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऩ चिं़ केळकर यांच्यासोबत शंकराचार्यांचा असलेला संपर्क, सहवास यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते़शंकराचार्यांचे या पुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी इंग्रजी भाषेत झाले, तर यावर्षी १३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठी भाषेत झाले आहे़ स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषांतरात शंकराचार्यांचा समत्वभाव लोकांसमोर आला आहे़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी, तर सूत्रसंचालन देवीदास जोशी यांनी केले़ (प्रतिनिधी)