शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

त्र्यंबकनजिक साकारतेय सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 00:20 IST

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.

ठळक मुद्देमुख्याधिकारी : ४० कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.दोन दिवसांपासून गोदावरी जलप्रदूषण संबंधित महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यासंदर्भात जाधव म्हणाले, की गोदावरी नदीपात्रात नगरपरिषदेच्या पहिल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून मल:निस्सारण होण्याचा प्रकार घडला असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत होते व त्यांनी ते हरित लवादाला पटवून दिले. त्यानुसार हरित लवादाने महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ठपका ठेवला होता. परंतु याबाबत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. नगर अभियंता यांच्याकडून प्रकल्पाचा ४० कोटींचा आराखडा तयार करून नकाशासह राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.सांडपाणी मैल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतकरी वापर करू शकतात, तर घनकचऱ्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे खत शेतात टाकून शेतकरी सेंद्रिय शेती करू शकतात, असा हा प्रकल्प आहे. सदर पाइपलाइन नदीपात्रात नव्हे; तर रस्त्यापासून दूर आहे. अहिल्या गोदावरीचे पात्र स्वच्छ केले जाईल, यासाठी जलतज्ज्ञांचे मतदेखील विचारात घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण