शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

त्र्यंबकनजिक साकारतेय सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 00:20 IST

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.

ठळक मुद्देमुख्याधिकारी : ४० कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.दोन दिवसांपासून गोदावरी जलप्रदूषण संबंधित महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यासंदर्भात जाधव म्हणाले, की गोदावरी नदीपात्रात नगरपरिषदेच्या पहिल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून मल:निस्सारण होण्याचा प्रकार घडला असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत होते व त्यांनी ते हरित लवादाला पटवून दिले. त्यानुसार हरित लवादाने महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ठपका ठेवला होता. परंतु याबाबत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. नगर अभियंता यांच्याकडून प्रकल्पाचा ४० कोटींचा आराखडा तयार करून नकाशासह राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.सांडपाणी मैल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतकरी वापर करू शकतात, तर घनकचऱ्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे खत शेतात टाकून शेतकरी सेंद्रिय शेती करू शकतात, असा हा प्रकल्प आहे. सदर पाइपलाइन नदीपात्रात नव्हे; तर रस्त्यापासून दूर आहे. अहिल्या गोदावरीचे पात्र स्वच्छ केले जाईल, यासाठी जलतज्ज्ञांचे मतदेखील विचारात घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण