शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

रेल्वे थांबे वाढविण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:46 IST

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ...

ठळक मुद्देबैठक : मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबत महाव्यवस्थापकांशी चर्चा

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन फक्त कोविड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोविडच्या चाचण्या करून फिजिकल डिस्टन्स ठेवूनच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठरावीक ठिकाणीच कोविड स्पेशल रेल्वेचा थांबा असल्याने, अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नसल्याने, प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ.भारती पवार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचेशी नासिक रोड येथील स्थानकात बैठकीदरम्यान चर्चा केली.या चर्चेदरम्यान नांदगाव येथे प्रवाशांची व पासधारक प्रवासी व यात्रेकरू यांची वाढती संख्या लक्षात घेता, या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेचा थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल, तसेच मनमाड, नासिक ते मुंबई येथे प्रवास करणारे अनेक चाकरमानी नोकरीच्या निमित्ताने आपल्या कार्यालयात रोज जाऊन येऊन नोकरी करतात. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात घेता, त्यांच्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वेळेवर पोहोचता येईल, तसेच मनमाड रेल्वे स्टेशन हे रेल्वे जंक्शन आहे आणि धुळे, नगर जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तथा चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव या आसपासच्या परिसरातील जनतेलाही देशभरात अनेक ठिकाणी जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून सुविधा उपलब्ध आहे, परंतु रेल्वेसेवा बंद असल्याने, त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत, त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या या बैठकीप्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांनी मांडल्या. या बैठकीप्रसंगी विवेक गुप्ता, युवराज पाटील यांच्यासह अनेक रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मनमाड स्थानकातील कामे संथगतीनेमनमाड मोठे रेल्वे जंक्शन असून, तेथे मोठा गुरुद्वारा असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देशभरातून अनेक भाविक या गुरुद्वारास भेट देण्यासाठी येत असतात. मनमाड शहराचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मनमाडची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील रेल्वे रुग्णव्यवस्था अधिक चांगली व्हावी, अधिकच्या रुग्णसुविधा रुग्णांना मिळाव्या व रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण व्हावे, यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मनमाड रेल्वे स्थानकात जी विकासकामे चालू आहेत, ती अतिशय संथ गतीने चालू आहेत, त्याही कामास गती मिळावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे