शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

शिंदे गाव येथील भरावा पुलाला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:20 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ठेवावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ठेवावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून, या मार्गावर श्ािंदेपासून जवळच भरावा पूल तयार केला जात आहे. या पुलामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी पुलास विरोध दर्शविला आहे. सकाळी ८ वाजता सरपंच माधुरी तुंगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ एकत्र आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलानास सुरुवात करण्यात आली.या पुलामुळे दररोज नाशिकरोडच्या बाजारपेठेत जाणारे शेतकरी, कामगार, तसेच शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग यांना या पुलामुळे त्रास होणार आहे. भराव्यामुळे गाव दुभंगले जाणार आहे. शिवाय सुरक्षिततेचादेखील प्रश्न निर्माण होणार आहे. याचा विचार करून भरावा पुलाचे काम बंद करावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.ग्रामस्थांचा आक्षेपया मार्गावर शिंदे ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, माध्यमिक विद्यालय, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी तसेच मंडल कार्यालय आहेत. या ठिकाणी रोजच नागरिकांची वर्दळ असते. नागरिकांना कामानिमित्त सतत ये-जा करावी लागते. या भरावा पुलामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.