शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साईनाथनगर सिग्नल नावालाच

By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST

नियमांची पायमल्ली : वाहतूक पोलीस नसल्याने दुर्लक्ष

इंदिरानगर : साईनाथनगर येथे अखेर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली मात्र सिग्नल केवळ नाममात्र ठरत असून, वाहनधारक सिग्नलचे नियम पाळत नसल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. साईनाथनगर चौफुली अत्यंत वर्दळीची चौफुली बनली आहे, मुंबर्ई महामार्ग, नाशिकरोड आणि इंदिरानगरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात घेता या चौकात वाहनांची गर्दी होत असते. याचा चौकात अपघात घडल्यानंतर येथे सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांची भावना लक्षात घेत या मार्गावर गतिरोधक टाकण्यात आले होते. या चौकातील वाढती वाहनांची वर्दळ पाहता तात्पुरत्या स्वरूपात गतिरोधक टाकूनही अपघाताचे प्रमाण कमी होत नसल्याने पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत नागरिकांनी आवाज उठविला होता. त्यामुळे अखेर पालिकेने मागणी मान्य करीत सिग्नल यंत्रणेसाठी साहित्य खरेदी केली सुमारे आठ महिन्यांपासून आणलेले साहित्य हेत सिटी उद्यानात पडून होते. त्यानंतर आलेल्या सिंहस्थाचे निमित्त लाभले आणि सिग्नल बसविण्यात आले, परंतु त्यानंतरही पंचवीस दिवस उलटूनही सिग्नलचे उद्घाटन होऊ शकलेले नव्हते. आता सिग्नल सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात या सिग्नलचे पालनच होत नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर) वाहनधारकांची उदासीनतासाईनाथनगर चौफुली नेहमीच धोकेदायक ठरली आहे. वाहने समोरासमोर आल्याने अपघाताचे प्रकार वाढले आहेत. त्यातच सुसाट वेगाने धावणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे तर हा चौक अधिकच धोकेदायक बनला आहे. महामार्गावर अनेक बिअरबार असल्याने मद्यपी रात्रीच्या सुमारास या चौकातून सुसाट वेगाने वाहने चालवितात. दिवसाही असे प्रकार दृष्टीस पडतात. त्यामुळे या चौकात कायमस्वरुपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी असून कित्येकदा पोलीस केवळ वसुलीचे काम करतात, त्यांनी वाहतूक नियमन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.