शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सायगावी कर्जमाफीचा ठराव

By admin | Updated: April 7, 2017 23:04 IST

येवला : तालुक्यातील सायगाव येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी येथील रोकडोबा पारावर कर्जमाफीचा ठराव करीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

येवला : तालुक्यातील सायगाव येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी येथील रोकडोबा पारावर कर्जमाफीचा ठराव करीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.सततचा दुष्काळ, शेतपिकांना कमी बाजारभाव, हमीभाव नाही अशा अनेक संकटांनी येवला तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. डोक्यावर कर्ज, वीजबिल भरण्यासाठी पैसे नाही, कांद्याला हमीभाव नाही. उत्तर प्रदेशात योगी सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफ करतंय तर महाराष्ट्रात फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला टाळाटाळ करत आहे. यामुळे सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहचविण्यासाठी येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने रोकडोबा पारावर सकाळी कर्जमाफीसंदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. सरपंच योगीता भालेराव अध्यक्षस्थानी होत्या. तालुक्यात मुख्य पीक कांदा असून, तो मातीमोल भावाने विकावा लागल्याने केलेला खर्चसुद्धा मिळाला नाही. उलट शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे कर्जमाफी करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन कर्जमाफीचा ठराव सर्वानुमते करण्यात आला व हा ठराव सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शेतकरी व ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते.यावेळी सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, सुनील देशमुख, गणपत खैरनार, दिनेश खैरनार, संगीता उशीर, सुनीता कोथमिरे, मीना खुरसने, मंदाकिनी भालेराव, प्रदीप दारुंटे, बाबूराव पठारे, भागुनाथ उशीर, संजय मिस्तरी, रघुनाथ खैरनार, बशीरभाई शेख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)