शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सायगावी कर्जमाफीचा ठराव

By admin | Updated: April 7, 2017 23:04 IST

येवला : तालुक्यातील सायगाव येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी येथील रोकडोबा पारावर कर्जमाफीचा ठराव करीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

येवला : तालुक्यातील सायगाव येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी येथील रोकडोबा पारावर कर्जमाफीचा ठराव करीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.सततचा दुष्काळ, शेतपिकांना कमी बाजारभाव, हमीभाव नाही अशा अनेक संकटांनी येवला तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. डोक्यावर कर्ज, वीजबिल भरण्यासाठी पैसे नाही, कांद्याला हमीभाव नाही. उत्तर प्रदेशात योगी सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफ करतंय तर महाराष्ट्रात फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला टाळाटाळ करत आहे. यामुळे सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहचविण्यासाठी येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने रोकडोबा पारावर सकाळी कर्जमाफीसंदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. सरपंच योगीता भालेराव अध्यक्षस्थानी होत्या. तालुक्यात मुख्य पीक कांदा असून, तो मातीमोल भावाने विकावा लागल्याने केलेला खर्चसुद्धा मिळाला नाही. उलट शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे कर्जमाफी करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन कर्जमाफीचा ठराव सर्वानुमते करण्यात आला व हा ठराव सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शेतकरी व ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते.यावेळी सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, सुनील देशमुख, गणपत खैरनार, दिनेश खैरनार, संगीता उशीर, सुनीता कोथमिरे, मीना खुरसने, मंदाकिनी भालेराव, प्रदीप दारुंटे, बाबूराव पठारे, भागुनाथ उशीर, संजय मिस्तरी, रघुनाथ खैरनार, बशीरभाई शेख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)