शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

साहेब, शेतकरी जगणार कसा?

By admin | Updated: June 25, 2014 00:14 IST

शेतकरी संतप्त : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिक : जिल्हा बॅँकेचे जिल्'ात थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपये थकीत असताना, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शेतकऱ्यांवर थेट जप्ती कारवाई करताना दारापुढील ट्रॅक्टर ओढून नेला जातो. गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान केलेले असताना, बॅँकेने थकबाकीदार ठरवून पीककर्ज देण्यास नकार दिल्याने अस्मानी संक ट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करीत बॅँकेने तत्काळ जप्ती मोहीम थांबवावी अन् अडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज मंजूर करण्याची मागणी करीत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात यामुळे वातावरण अधिकच तापले होते.स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कांद्याचे निर्यात मूल्य, जिल्हा बॅँकेची जप्ती मोहीम, कृषी विभागाकडून विलंबाने होणारे पंचनामे यांसह विविध मागण्यांसंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान जिल्हा बॅँक व कृषी अधिकाऱ्यांना पाचारण न केल्यास कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रारंभी कठोर भूमिका घेत आंदोलनाची ही रीत नसल्याचे खडसावले. तरीही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी लावून धरल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले. यादरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणावे, बॅँकेच्या जप्ती मोहिमेमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्येची वेळ आली आहे, तर गारपिटीचे पंचनामे करताना कृषी अधिकारी आणि तलाठ्यांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाल्याने ते उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता त्यांनी, कांद्यासाठी शेतकरीच ९० टक्के बियाणे तयार करीत असतो, तर कंपन्यांकडे दहा टक्के बियाणे असते. सद्यस्थितीतही कंपन्यांकडे तेवढेच बियाणे असले, तरी किमान २५०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी विक्रेत्याबाबत लेखी तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल; परंतु शेतकरी लेखीऐवजी तोंडीच तक्रारी करीत असल्याबद्दल पन्हाळे यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा बॅँकेकडून होणाऱ्या जप्ती मोहिमेवरून संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेचे प्रशासकीय व कृषी व्यवस्थापक सुदाम देवरे यांना धारेवर धरत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी नासाकावरील कारवाईचे उदाहरण देत इतरांवर कारवाई सुरू असल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर कोणती कारवाई केली याची विचारणा केली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचे हप्ते आठ-दहा वर्षांपासून थकीत आहेत त्यांच्यावर कारवाई केल्याचे देवरे यांनी सांगत, पीककर्जाचेही थकीत व्याज जरी शेतकऱ्यांनी अदा केले तरी त्यांना पुढील पीककर्ज देता येऊ शकेल. तसे न करताच थकीत असताना नव्याने कर्ज देण्यास शासनानेच विरोध केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी बॅँकेकडे निवेदन द्यावे, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे देवरे यांनी सांगितल्यानंतर शेतकरी शांत झाले. सदरच्या चर्चेमध्ये स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक पगार, संजय देवरे, बापू जाधव, शिवाजी राजोळे आदिंनी सहभाग घेतला. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता. ‘त्या’ तलाठ्यावर कारवाईचे आदेशचर्चेदरम्यान संजय देवरे या शेतकऱ्याने लखमापूर (ता. सटाणा) येथील तलाठ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असून, पंचनाम्यांवर स्वाक्षरी न देताच दादागिरीची व अर्वाच्य भाषा वापरीत असल्याची तक्रार केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी तातडीने तहसीलदारांशी संपर्क साधून ‘नागरे’नामक तलाठ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.