शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, शेतकरी जगणार कसा?

By admin | Updated: June 25, 2014 00:14 IST

शेतकरी संतप्त : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिक : जिल्हा बॅँकेचे जिल्'ात थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपये थकीत असताना, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शेतकऱ्यांवर थेट जप्ती कारवाई करताना दारापुढील ट्रॅक्टर ओढून नेला जातो. गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान केलेले असताना, बॅँकेने थकबाकीदार ठरवून पीककर्ज देण्यास नकार दिल्याने अस्मानी संक ट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करीत बॅँकेने तत्काळ जप्ती मोहीम थांबवावी अन् अडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज मंजूर करण्याची मागणी करीत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात यामुळे वातावरण अधिकच तापले होते.स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कांद्याचे निर्यात मूल्य, जिल्हा बॅँकेची जप्ती मोहीम, कृषी विभागाकडून विलंबाने होणारे पंचनामे यांसह विविध मागण्यांसंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान जिल्हा बॅँक व कृषी अधिकाऱ्यांना पाचारण न केल्यास कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रारंभी कठोर भूमिका घेत आंदोलनाची ही रीत नसल्याचे खडसावले. तरीही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी लावून धरल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले. यादरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणावे, बॅँकेच्या जप्ती मोहिमेमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्येची वेळ आली आहे, तर गारपिटीचे पंचनामे करताना कृषी अधिकारी आणि तलाठ्यांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाल्याने ते उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता त्यांनी, कांद्यासाठी शेतकरीच ९० टक्के बियाणे तयार करीत असतो, तर कंपन्यांकडे दहा टक्के बियाणे असते. सद्यस्थितीतही कंपन्यांकडे तेवढेच बियाणे असले, तरी किमान २५०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी विक्रेत्याबाबत लेखी तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल; परंतु शेतकरी लेखीऐवजी तोंडीच तक्रारी करीत असल्याबद्दल पन्हाळे यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा बॅँकेकडून होणाऱ्या जप्ती मोहिमेवरून संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेचे प्रशासकीय व कृषी व्यवस्थापक सुदाम देवरे यांना धारेवर धरत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी नासाकावरील कारवाईचे उदाहरण देत इतरांवर कारवाई सुरू असल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर कोणती कारवाई केली याची विचारणा केली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचे हप्ते आठ-दहा वर्षांपासून थकीत आहेत त्यांच्यावर कारवाई केल्याचे देवरे यांनी सांगत, पीककर्जाचेही थकीत व्याज जरी शेतकऱ्यांनी अदा केले तरी त्यांना पुढील पीककर्ज देता येऊ शकेल. तसे न करताच थकीत असताना नव्याने कर्ज देण्यास शासनानेच विरोध केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी बॅँकेकडे निवेदन द्यावे, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे देवरे यांनी सांगितल्यानंतर शेतकरी शांत झाले. सदरच्या चर्चेमध्ये स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक पगार, संजय देवरे, बापू जाधव, शिवाजी राजोळे आदिंनी सहभाग घेतला. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता. ‘त्या’ तलाठ्यावर कारवाईचे आदेशचर्चेदरम्यान संजय देवरे या शेतकऱ्याने लखमापूर (ता. सटाणा) येथील तलाठ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असून, पंचनाम्यांवर स्वाक्षरी न देताच दादागिरीची व अर्वाच्य भाषा वापरीत असल्याची तक्रार केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी तातडीने तहसीलदारांशी संपर्क साधून ‘नागरे’नामक तलाठ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.