शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सादरे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकणार?

By admin | Updated: October 30, 2015 23:26 IST

सादरे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकणार?

नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी स्वत: लिहिलेल्या आत्महत्त्यापूर्व निवेदनाच्या आधारे, परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकरवी अगोदरच एक चौकशी सुरू असताना, ते प्रामुख्याने ज्यांची चौकशी करणार त्यांचीच चौकशी करण्याचे स्थानिक पोलिसांचे काम आता राज्यस्तरीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने हे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकून पडेल की काय, अशी साधार शंका निर्माण झाली आहे.राज्याच्या गृह विभागाने कोणताही गाजावाजा न करता वरील निर्णय अगदी गुपचूप घेतल्यानेही शंकेस जागा झाली आहे. त्यातच चौकशीचे काम जो अधिकारी करणार तो त्याच्या समकक्ष दुसऱ्या निरीक्षकाची आणि त्याच्याहून उच्चपदस्थ पोलीस अधीक्षकाची चौकशी नि:पक्षपातीपणाने व निडर होऊन करू शकेल याबाबतही शंकाच आहे. (पान ५ वर)पोलीस निरीक्षक अशोक सादरे जळगाव जिल्ह्णात नियुक्त पण निलंबित होतेआणि त्यांनी नाशकातील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्त्या केली,त्यामुळे दोन्ही जिल्ह्णांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर आणि तेथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते या दोघांना संशयित म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. सादरे यांची आत्महत्त्या वाळू ठेकेदारीशी निगडित असल्याने साहजिकच महसूल खाते आणि महसूलमंत्री यांच्याशी तिचा संबंध जोडला जात आहे. त्यातच भारतीय पोलीस सेवेतील एका अधिकाऱ्याची कार्यपद्धती सादरे यांच्या निवेदनाने संशयास्पद ठरल्याने संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी, असा कोणताही हेतू यात दिसत नाही. सादरे यांच्या आत्महत्त्येला दोन आठवड्यांचा काळ उलटून गेला. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी पंचनामा, साक्षीदारांचे जाब-जबाब, फिर्यादीची तक्रार, पुरावे गोळा करणे आदि कामे स्थानिक अधिकाऱ्यांनी पूर्ण करून गुन्हाही दाखल केला आहे. संशयित आरोपींच्या अटकेची तयारीही स्थानिक पोलीस करीत असताना (सागर चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला) अचानक प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. त्यात स्थानिक पोलिसांनी केलेले कामच निर्णायकही ठरणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह चौकशी करीत आहेत. ती अशोक सादरे यांची पोलीस खात्यातील वर्तणूक व त्यांना सेवेत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला त्रास याच्याशी संबंधित आहे. सादरे सेवेत असताना तीनदा त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनीच निलंबित केले होते. आणि विशेष म्हणजे सादरे यांच्या तिसऱ्या निलंबनाच्या आधी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केवळ बदलीचा प्रस्ताव पाठविला असतानाही त्यांना विशेष महानिरीक्षकांनी निलंबित केले होते. आता तेच हे प्रकरण हाताळणार आहेत. परिणामी एकाच प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी तिच्यातील गूढताच दर्शविते.