शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

By admin | Updated: June 2, 2017 01:57 IST

बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा’ अशा एकूण सात मागण्यांसाठी राज्याचा पोशिंदा बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले. यामुळे पंचवटीमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळपासून ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. याबरोबरच शहरवासीयांना कांद्यापासून तर विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या किरकोळ बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागल्या. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी ‘सुटी’ घेत शहराची रसद रोखली. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या संपाचे पडसाद सूर्योदयानंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पहावयास मिळाले. पंचवटीमधील बाजार समितीचे शटर बुधवारी संध्याकाळनंतर उघडलेच नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीमधील व्यवहार कोलमडले. बाजार समितीमध्ये कु ठल्याही प्रकारचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीमध्ये पाऊ ल ठेवले नाही. किरकोळ भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांकडून बुधवारी जादा माल खरेदी करण्यात आला होता. यामुळे शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा, जुने नाशिक, गंगापूररोड, महात्मानगर आदि परिसरात भाजीविक्रेत्यांनी दुकाने नियमितपणे सुरू ठेवली होती. संध्याकाळीदेखील काही उपनगरांमध्ये भाजीबाजार थाटण्यात आला होता. मात्र भाजीपाला किंवा फळभाज्यांचा जास्त साठादेखील करणे लहान विक्रेत्यांना शक्य नाही, कारण हा नाशवंत माल असतो. यामुळे जर बाजार समित्यांमधील व्यवहार शुक्रवारी (दि.२) पूर्ववत झाले नाही तर मात्र नाशिककरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजीपाला, फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. कारण किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध राहणार नसल्यामुळे शहरातील विविध उपनगरांमधील भाजीबाजारही आपोआप बंद होण्याचा धोका उद्भवू शकतो.