शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

By admin | Updated: June 2, 2017 01:57 IST

बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा’ अशा एकूण सात मागण्यांसाठी राज्याचा पोशिंदा बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले. यामुळे पंचवटीमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळपासून ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. याबरोबरच शहरवासीयांना कांद्यापासून तर विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या किरकोळ बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागल्या. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी ‘सुटी’ घेत शहराची रसद रोखली. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या संपाचे पडसाद सूर्योदयानंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पहावयास मिळाले. पंचवटीमधील बाजार समितीचे शटर बुधवारी संध्याकाळनंतर उघडलेच नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीमधील व्यवहार कोलमडले. बाजार समितीमध्ये कु ठल्याही प्रकारचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीमध्ये पाऊ ल ठेवले नाही. किरकोळ भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांकडून बुधवारी जादा माल खरेदी करण्यात आला होता. यामुळे शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा, जुने नाशिक, गंगापूररोड, महात्मानगर आदि परिसरात भाजीविक्रेत्यांनी दुकाने नियमितपणे सुरू ठेवली होती. संध्याकाळीदेखील काही उपनगरांमध्ये भाजीबाजार थाटण्यात आला होता. मात्र भाजीपाला किंवा फळभाज्यांचा जास्त साठादेखील करणे लहान विक्रेत्यांना शक्य नाही, कारण हा नाशवंत माल असतो. यामुळे जर बाजार समित्यांमधील व्यवहार शुक्रवारी (दि.२) पूर्ववत झाले नाही तर मात्र नाशिककरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजीपाला, फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. कारण किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध राहणार नसल्यामुळे शहरातील विविध उपनगरांमधील भाजीबाजारही आपोआप बंद होण्याचा धोका उद्भवू शकतो.