शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

By admin | Updated: June 2, 2017 01:57 IST

बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा’ अशा एकूण सात मागण्यांसाठी राज्याचा पोशिंदा बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले. यामुळे पंचवटीमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळपासून ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. याबरोबरच शहरवासीयांना कांद्यापासून तर विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या किरकोळ बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागल्या. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी ‘सुटी’ घेत शहराची रसद रोखली. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या संपाचे पडसाद सूर्योदयानंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पहावयास मिळाले. पंचवटीमधील बाजार समितीचे शटर बुधवारी संध्याकाळनंतर उघडलेच नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीमधील व्यवहार कोलमडले. बाजार समितीमध्ये कु ठल्याही प्रकारचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीमध्ये पाऊ ल ठेवले नाही. किरकोळ भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांकडून बुधवारी जादा माल खरेदी करण्यात आला होता. यामुळे शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा, जुने नाशिक, गंगापूररोड, महात्मानगर आदि परिसरात भाजीविक्रेत्यांनी दुकाने नियमितपणे सुरू ठेवली होती. संध्याकाळीदेखील काही उपनगरांमध्ये भाजीबाजार थाटण्यात आला होता. मात्र भाजीपाला किंवा फळभाज्यांचा जास्त साठादेखील करणे लहान विक्रेत्यांना शक्य नाही, कारण हा नाशवंत माल असतो. यामुळे जर बाजार समित्यांमधील व्यवहार शुक्रवारी (दि.२) पूर्ववत झाले नाही तर मात्र नाशिककरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजीपाला, फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. कारण किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध राहणार नसल्यामुळे शहरातील विविध उपनगरांमधील भाजीबाजारही आपोआप बंद होण्याचा धोका उद्भवू शकतो.