शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बेस्ट सेवेतील एस. टी. बसेस माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात येणाऱ्या बसेस आता शनिवार (दि. १५)पासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत असलेल्या बसेस माघारी येणार आहेत.

कोरोनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने बेस्ट उपक्रमाला वाहतूक करण्यासाठी राज्यभरातील आगारांमधून सुमारे एक हजार बसेस पुरविण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांमधूनदेखील बसेस, चालक-वाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजवावी लागली. कोरोनाच्या काळातील ड्युटी तसेच राहण्याची आणि अन्नपाण्याची होणारी गैरसोय यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी करण्याबाबत नाराजीदेखील होती. मात्र, मुंबईत ड्युटी करणे बंधनकारक करण्यात आल्याने एस. टी. प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवले.

नाशिक विभागातून पंधरा दिवसातून चालक-वाहकांना मुंबईला जावे लागत होते. जिल्ह्यातील १३ आगारांमधून मुंबईला बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील वर्षी सुरू झालेली ही सेवा मे २०२१पर्यंतही सुरू आहे. सद्यस्थितीत ५० बसेस आणि २०० कर्मचारी मुंबईला सेवा बजावत आहेत. आता मात्र या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने राज्यभरातील एस. टी. विभागातून आलेल्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याबाबतचे पत्र राज्य परिवहन महामंडळाला दिले आहे.

मुंबईत कोरोनाच्या काळात सेवा करण्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातही लागलीच सेवा बजवावी लागत होती. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची चिंता होती. यातूनच मुंबईतील ड्युटीला विरोध केला जात होता. मात्र, अशा विरोध करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आल्याने चालक-वाहकांना मुंबईत सेवा करावी लागत होती. आता ‘बेस्ट’नेच एस. टी.ची सेवा कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

---इन्फो--

राज्यभरातील नऊ आगारांच्या २५५ बसेस रिटर्न

‘बेस्ट’ने रायगड, रत्नागिरी, धुळे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली अशा नऊ आगारांतील सुमारे २५५ बसेस पुन्हा संबंधित विभागांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काही विभागांच्या बसेस थोड्या प्रमाणात सुरू राहणार आहेत.