शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बेस्ट सेवेतील एस. टी. बसेस माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात येणाऱ्या बसेस आता शनिवार (दि. १५)पासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत असलेल्या बसेस माघारी येणार आहेत.

कोरोनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने बेस्ट उपक्रमाला वाहतूक करण्यासाठी राज्यभरातील आगारांमधून सुमारे एक हजार बसेस पुरविण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांमधूनदेखील बसेस, चालक-वाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजवावी लागली. कोरोनाच्या काळातील ड्युटी तसेच राहण्याची आणि अन्नपाण्याची होणारी गैरसोय यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी करण्याबाबत नाराजीदेखील होती. मात्र, मुंबईत ड्युटी करणे बंधनकारक करण्यात आल्याने एस. टी. प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवले.

नाशिक विभागातून पंधरा दिवसातून चालक-वाहकांना मुंबईला जावे लागत होते. जिल्ह्यातील १३ आगारांमधून मुंबईला बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील वर्षी सुरू झालेली ही सेवा मे २०२१पर्यंतही सुरू आहे. सद्यस्थितीत ५० बसेस आणि २०० कर्मचारी मुंबईला सेवा बजावत आहेत. आता मात्र या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने राज्यभरातील एस. टी. विभागातून आलेल्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याबाबतचे पत्र राज्य परिवहन महामंडळाला दिले आहे.

मुंबईत कोरोनाच्या काळात सेवा करण्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातही लागलीच सेवा बजवावी लागत होती. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची चिंता होती. यातूनच मुंबईतील ड्युटीला विरोध केला जात होता. मात्र, अशा विरोध करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आल्याने चालक-वाहकांना मुंबईत सेवा करावी लागत होती. आता ‘बेस्ट’नेच एस. टी.ची सेवा कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

---इन्फो--

राज्यभरातील नऊ आगारांच्या २५५ बसेस रिटर्न

‘बेस्ट’ने रायगड, रत्नागिरी, धुळे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली अशा नऊ आगारांतील सुमारे २५५ बसेस पुन्हा संबंधित विभागांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काही विभागांच्या बसेस थोड्या प्रमाणात सुरू राहणार आहेत.