शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

धोंडा न्हाण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:36 IST

त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वराचे दर्शन व कुशावर्त तीर्थात स्नानासाठी भाविकांची गर्दी हिंदूधर्मीय भाविकांचा कल त्र्यंबकेश्वरला वाढला

त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला.त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर अनेक महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. अधिकमासाची सुरुवात झाल्यापासून त्र्यंबकेश्वर शहर गजबजून गेले आहे. भर उन्हात भाविक अनवाणी पायाने अक्षरश: पळत सुटतात. त्यातल्या त्यात वृद्ध व लहान मुले असल्यावर तर अशा भाविकांचे हाल बघवत नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर सभोवती रस्त्यावर कार्पेट टाकून तात्पुरती उन्हापासून व्यवस्था केली आहे. तरीदेखील चटके बसायचे ते बसतातच. लक्ष्मीनारायण चौक ते कुशावर्त तीर्थ या ७५० फूट व ३ फूट रुंदीच्या रबर पेंटचा (आॅइलपेंट) पट्टा भाविकांना जाण्या-येण्यासाठी येथील पुरोहित संघातर्फे मारण्यात आला आहे. या पेंटचा पट्टा मारल्याने चटके बसत नसल्याचा दावा पुरोहित संघातर्फे केला जात आहे. मे महिन्याच्या सुट्या, त्यात शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी नोकरवर्ग त्र्यंबकेश्वरला हमखास येत असतात. त्यामुळेच सध्या अधिकमासाच्या निमित्ताने हिंदूधर्मीय भाविकांचा कल त्र्यंबकेश्वरला वाढला आहे.त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असल्याने त्र्यंबकेश्वराचे दर्शन व कुशावर्त तीर्थात स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. विशेषत: महिलावर्गाची गर्दी लक्षणीय दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील भाविक त्र्यंबकेश्वर गाठत आहेत. आता दररोज त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्र्यंबक नगर परिषद सज्ज झाली आहे. साफसफाई, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा आदी बाबी नगर परिषदेने सांभाळल्या आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत, तर अन्य भेटवस्तू पूजेचे सामान आदींची चांगली विक्र ी होत आहे.

जावईबापू, तुम्हाला वाटेल ती वस्तू घ्या...

अधिकमासात तीर्थक्षेत्री दर्शन, स्नानसंध्या, पूजा, धार्मिक विधी, दान, गोमातेला घास आदी पुण्य सांगितले आहेत. दर तीन वर्षांनी येणाºया अधिकमास तथा धोंड्याच्या महिन्यात लाडक्या जावईबापूंना सासुरवाडीकडून आपापल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देण्यात येते. कोणी कपडे घेतात, कोणी सोन्याची वस्तू देतात, तर कोणी रोख रकमेच्या स्वरूपात भेट देतात. हेतू हा की तुमच्या पसंतीप्रमाणे तुम्हाला वाटेल ती वस्तू घ्या.. अर्थात, दिलेल्या रोख रकमेत बसेल अशी.