शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली

By श्याम बागुल | Updated: May 14, 2021 01:41 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा  ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.    

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे प्रयत्न : पाॅझिटिव्हिटी दरातही मोठी घट

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा  ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.    विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेले नाशिक, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड व देवळा या तालुक्यांमध्येदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असून, निफाड व नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र, अजूनही कोरोना ठाण मांडून बसला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. विशेष करून नाशिक  शहराशी व्यापार, व्यवसाय व नोकरी धंद्यानिमित्त संबंध येणाऱ्या लगतच्या सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याबरोबरच सोयी, सुविधांचीही वाणवा जाणवली. नाशिक शहरात बेड कमी पडू लागल्याने ग्रामीणचे रुग्ण दाखल करण्यासाठी वणवण भटकावे लागले. त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गावांनीही पुढाकार घेत स्वयंस्फूर्तीने गावे बंद  ठेवली. तसेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलविले. याचा सर्व एकत्रित परिणाम गेल्या काही दिवसांत जाणवू लागला असून, त्यातूनच १ मेच्या तुलनेत १३ मे रोजी रुग्णांची संख्या जवळपास ५३८० ने कमी झाली आहे.नऊ टक्क्यांनी दर घसरला१ मे रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६३७७ रुग्ण  होते. त्यावेळी  करण्यात आलेल्या एका दिवसाच्या ५२०६ संशयित रुग्णांच्या चाचणीत कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण १५०३ म्हणजेच पॉझिटिव्हीटी दर २८.८७ इतका होता. गेल्या बारा दिवसांत हेच प्रमाण आता कमी झाले असून, १३ मे रोजी जिल्ह्यात १०,९९७ इतके रुग्ण असून, ५५६७ संशयित रुग्णांच्या तपासणीतून १०९७ रुग्ण बाधित सापडले आहेत, पॉझिटिव्हीटी दर १९.७१ इतक्या खाली आला आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या