शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रु सलेला वरुणराजा परतला

By admin | Updated: July 3, 2016 23:58 IST

महिन्यानंतर हजेरी : पेरणीयोग्य पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा, पाणीटंचाई कायम

 येवला : पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्यापासून येवला शहर व परिसरासह दहा किलोमीटर परिघात दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारी तासभर हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पाणीटंचाईच्या भीषण संकटाने ग्रासलेल्या पालिका प्रशासनाने अद्यापही सुटकेचा नि:श्वास सोडलेला नाही. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊ दे आणि पाणी संकट दूर होऊ दे, अशीच प्रार्थना आजही कायम आहे. पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने येवला शहरवासीय चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी रविवारपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर ४ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी तासभर हजेरी लावली. अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांंचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना रविवारी पाऊस पडता झाला. आता पावसाने रोज यावे, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ओला दुष्काळ परवडला पण पाऊस हवाच, अशी भावनादेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने शहरासह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट नाही, वादळवारा नाही अशातच रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन वर्षांपासून येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. यंदा पाणीटंचाईचा सामना करताना तालुकावासीय व प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यात जून संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले होते. पाऊस सुरू झाला म्हणून आता सर्वांच्याच चेहऱ्यावरची कळी खुलली आहे.