शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रु सलेला वरुणराजा परतला

By admin | Updated: July 3, 2016 23:58 IST

महिन्यानंतर हजेरी : पेरणीयोग्य पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा, पाणीटंचाई कायम

 येवला : पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्यापासून येवला शहर व परिसरासह दहा किलोमीटर परिघात दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारी तासभर हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पाणीटंचाईच्या भीषण संकटाने ग्रासलेल्या पालिका प्रशासनाने अद्यापही सुटकेचा नि:श्वास सोडलेला नाही. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊ दे आणि पाणी संकट दूर होऊ दे, अशीच प्रार्थना आजही कायम आहे. पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने येवला शहरवासीय चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी रविवारपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर ४ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी तासभर हजेरी लावली. अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांंचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना रविवारी पाऊस पडता झाला. आता पावसाने रोज यावे, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ओला दुष्काळ परवडला पण पाऊस हवाच, अशी भावनादेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने शहरासह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट नाही, वादळवारा नाही अशातच रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन वर्षांपासून येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. यंदा पाणीटंचाईचा सामना करताना तालुकावासीय व प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यात जून संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले होते. पाऊस सुरू झाला म्हणून आता सर्वांच्याच चेहऱ्यावरची कळी खुलली आहे.