शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

रु सलेला वरुणराजा परतला

By admin | Updated: July 3, 2016 23:58 IST

महिन्यानंतर हजेरी : पेरणीयोग्य पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा, पाणीटंचाई कायम

 येवला : पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्यापासून येवला शहर व परिसरासह दहा किलोमीटर परिघात दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारी तासभर हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पाणीटंचाईच्या भीषण संकटाने ग्रासलेल्या पालिका प्रशासनाने अद्यापही सुटकेचा नि:श्वास सोडलेला नाही. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊ दे आणि पाणी संकट दूर होऊ दे, अशीच प्रार्थना आजही कायम आहे. पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने येवला शहरवासीय चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी रविवारपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर ४ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी तासभर हजेरी लावली. अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांंचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना रविवारी पाऊस पडता झाला. आता पावसाने रोज यावे, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ओला दुष्काळ परवडला पण पाऊस हवाच, अशी भावनादेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने शहरासह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट नाही, वादळवारा नाही अशातच रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन वर्षांपासून येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. यंदा पाणीटंचाईचा सामना करताना तालुकावासीय व प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यात जून संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले होते. पाऊस सुरू झाला म्हणून आता सर्वांच्याच चेहऱ्यावरची कळी खुलली आहे.