शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

धार्मिक स्थळांचे पुरावे देण्यासाठी विश्वस्तांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 20:17 IST

महापालिका : प्रशासनाकडून कारवाईची तयारी

ठळक मुद्दे१५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाईपुरावे दिल्यास सदर स्थळांवर कारवाई थांबविण्यात येणार असल्याची माहिती

नाशिक - महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही धार्मिक स्थळांबाबत संबंधित संस्था-विश्वस्तांनी आवश्यक ते दस्तावेज व पुरावे सादर करण्यासाठी धावाधाव चालविली आहे. दरम्यान, पुरावे दिल्यास सदर स्थळांवर कारवाई थांबविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्तांनी दिली आहे.महापालिकेने सन २००९ पूर्वीची रस्त्यांवर अडथळा ठरणारी १५० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने त्यासाठी संबंधित धार्मिक स्थळांना नोटीसाही चिकटविल्या आहेत. महापालिकेच्या या अल्टीमेटमनंतर काही धार्मिक स्थळांंच्या संस्था अथवा विश्वस्तांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये धाव घेतली असून आवश्यक ते पुरावे सादर केले जात आहेत. त्यात काही धार्मिक स्थळे ही महापालिकेच्या सध्या ताब्यात नसलेल्या डीपीरोडमध्ये असल्याने ती वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतील आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धार्मिक स्थळांच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणारे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर आणि भागवत आरोटे यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे एका पत्राद्वारे आजवर केलेल्या कारवाईची आणि येत्या काळात करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतची माहिती मागविली आहे. दातीर यांनी पत्रात म्हटले आहे, उच्च न्यायालयात धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईविरोधी याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यापूर्वी काही मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे आदेशित केले होते. या सूचनेनंतर न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली होती. त्यामुळे न्यायालयाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब होतो आहे किंवा नाही, याची माहिती देण्याची मागणी दातीर यांनी केली आहे.इन्फोप्रशासनाकडून पुन्हा पडताळणीमहापालिकेकडून १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई केली जाणार आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाकडून पुन्हा एकदा प्रत्येक प्रकरण तपासून पाहून पडताळणी केली जात आहे. प्रत्यक्ष कारवाईत कुठे अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांविरुद्ध या मोहिमेत कारवाई केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे.