शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

पूरग्रस्तांची पंचनाम्यासाठी धावाधाव

By admin | Updated: August 21, 2016 02:06 IST

विमा कंपनीकडून नुकसानभरपाई : यंत्रणेवर दबाव

नाशिक : सलग चोवीस तास धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे शहरातील गोदावरीसह नासर्डी, वाघाडी नदीला आलेल्या पुराचे दुकानांमध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व्यावसायिकांची तीन आठवड्यानंतरही धावाधाव सुरू असून, आजवर आठशेहून अधिक पंचनामे करण्यात आले असले तरी, दररोज किमान दहा ते पंधरा व्यावसायिकांचे अर्ज तहसील कार्यालयात येऊन धडकत आहेत. दि. २ आॅगस्ट रोजी नाशिकसह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली, गंगापूर धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर गोदावरीला येऊन मिळणारे नालेही दुथडी भरून वाहिले, नासर्डी व वाघाडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहिल्याने गोदावरीनेही रौद्ररूप धारण केले. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या, तर शहरातील सराफ बाजार, कापडबाजार, हुंडीवाला लेन, दिल्ली दरवाजा, बालाजी कोट आदि व्यावसायिक ठिकाणीही गोदावरीचे पाणी शिरले. साधारणत: कंबरे एवढे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. पाण्यात भिजलेल्या मालाचे नंतर सेल लावून कमी किमतीत व्यावसायिकांनी विक्री केली असली तरी, अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या मालाचा विमा काढला असल्याने कंपनीकडे नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेला पंचनामा त्यासाठी आवश्यक आहे, परंतु शासकीय यंत्रणेने अगोदर नदीकाठच्या रहिवाशांच्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य दिले, सलग आठ ते दहा दिवस जवळपास साडेतीन हजार कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले, त्यात झालेले नुकसान, घराचा वर्ग आदि बाबी नमूद करण्यात आल्या. त्यानंतर मात्र व्यावसायिकदार, दुकानदारांनी आपल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल खात्याकडे तगादा लावायला सुरुवात केली आहे. आजवर आठशेहून अधिक दुकानदारांचे पंचनामे करण्यात आले असून, तरीही दररोज दहा ते पंधरा दुकानदारांचे तहसील कार्यालयात अर्ज येऊन धडकत आहे. विमा कंपन्या नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा पंचनामा ग्राह्य धरत आहेत, त्यामुळे पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेवर दबाव वाढला आहे. (प्रतिनिधी)