शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

खत प्रकल्पातून मनपाला साडेपाच कोटींचा भुर्दंड

By admin | Updated: June 2, 2015 00:14 IST

भूसंपादन प्रकरण : स्थायीच्या बैठकीत चर्चेविना मंजुरी

नाशिक : पाथर्डी शिवारात वीस वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या खत प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी साडेपाच कोटींच्या वाढीव मोबदल्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिकेला मूळ रक्कमेपेक्षा व्याजापोटी चौपटीने रक्कम मोजावी लागणार असल्याने तब्बल साडेचार कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल. सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत खत प्रकल्प भूसंपादनाचा विषय पटलावर ठेवण्यात आला. त्यास सदस्यांच्या उपस्थितीत कुठलीही चर्चा न करता थेट मंजुरी देण्यात आली. पाथर्डी शिवारातील सर्व्हे नंबर २६३, २६४, २७३, २७४, २७६, २७७, २७८ मधील ३५.८५ हेक्टर क्षेत्र १९९५ मध्ये संपादित करण्यात आले होते. या भूसंपादनासाठी तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी १४ जुलै १९९५ मध्ये बाजारमूल्य दरानुसार जमीन, झाडे, विहीर व बांधकाम या सर्व बाबी विचारात घेऊन एक कोटी दहा लाख १८ हजार ८९८ असा निवाडा जाहीर केला होता. त्यानुसार ३३.२८ हेक्टर क्षेत्राची कब्जा पावती १६ डिसेंबर १९९६ रोजी करण्यात आली होती. दरम्यान, या निवाड्यातील मोबदला रक्कम दर जमीनमालकास मान्य नसल्याने त्यांनी वाढीव मोबदल्यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या विरोधात लागला. न्यायालयाने जमीनमालकास एक कोटी ४८ लाख सहा हजार ९४९ रुपयांचा वाढीव मोबदला देण्याचे आदेश २० डिसेंबर २०१० रोजी पारित केले होते.^ या दाव्यामधील आदेशात भूसंपादन अधिकारी यांनी ताबा घेतल्यापासून एक वर्षापर्यंत नऊ टक्के आणि त्यानंतर संपूर्ण रक्कमेचा भरणा होईपर्यंत १५ टक्के व्याजाची रक्कम जमीनमालकास द्यावी, असे नमूद केले होते. मात्र ही बाब महापालिकेला मान्य नसल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एक कोटी ४८ लाख सहा हजार ९४९ या रक्कमेवर नऊ टक्के व्याजाने १ वर्षासाठी १३ लाख ३२ हजार ६२६ व त्यापुढील ५ जून २०१५ पर्यंतच्या कालावधीकरिता १५ टक्क्यांप्रमाणे तीन कोटी ९७ लाख ४३ हजार ९८९ रुपये अशी एकूण पाच कोटी ४८ लाख ८३ हजार ५६३ रुपये इतकी रक्कम अदा करण्याचे पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पाठविले. तसेच ही रक्कम मनपाने न्यायालयात जमा न केल्यास मनपाविरुद्ध हुकूम होऊ शकेल, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला, त्यास चर्चेविना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)