शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

By admin | Updated: July 3, 2014 00:07 IST

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

 

प्रवीण साळुंके

मालेगावरामनगर ते उमराणेदरम्यान मुंबई - आग्रा महामार्गावरून वाळूची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक करताना सर्व नियम पायदळी तुडविले जात असूनही या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष. या नियमबाह्य वाहतुकीमुळे नागरिकांना विशेषत: वाटसरुंना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी वाटसरुंनी केली आहे.धुळे परिसरातून वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर नाशिककडे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचे यासाठी काही नियम आहेत. त्यात वाहनाची क्षमता, वाळू भरण्याची क्षमता, वाहतूक करताना घ्यावयाची काळजी आदिंचा समावेश आहे. हे नियम पाळले जावे यासाठी त्यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार तहसीलदार तसेच महसूल विभागाला देण्यात आले आहेत. ही वाहतूक करताना सर्वांत महत्त्वाचे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरू नये तसेच ही वाळू पूर्णपणे झाकलेली असावी या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. महामार्गावरून दिवसभरातून पाचशेपेक्षा जास्त वाहनांद्वारे वाळूची वाहतूक करण्यात येत असून, यातील जवळपास सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दोन ते तीन ब्रास जास्त वाळू भरलेली असते. वाहनातील वाळू ही न झाकताच वाहिली जात असून, तर काही वाहनांवर नावालाच हिरवे किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकलेले असते. मालट्रक व लेलनसारखी वाहने न झाकताच नेली जात आहे. त्यामुळे या वाहनातील वाळू उडत असून, ती वाटसरुंना लागते. काहीवेळा ही वाळू डोळ्यात जाऊन डोळ्याला गंभीर दुखापतीही होत आहेत. तसेच यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन वाहने उलटण्याचे प्रमाणही वाढत आहे. तसेच या वाळूपासून संरक्षण करण्याच्या नादात वाहने पुढील वाहनावर आदळतात. त्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीव गमावण्याची वेळ येत आहे. या गौण खनिजधारकांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झालेले आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यास वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहेत. महामार्गावर रोज दोनशे ते तीनशे वाहनांत क्षमतेच्या कित्येकपट वाळू भरून वाहतूक केली जात असताना या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही हे विशेष. येथील उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांत एकाही वाळू वाहनावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या वाहतुकीमुळे जनसामान्य त्रस्त असताना येथील महसूल विभाग तसेच परिवहन विभागाचे अधिकारी काय करतात, असा प्रश्न जनसामान्यात विचारला जात आहे. वाहनधारकांवर कारवाई करून अशा वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.