शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

By admin | Updated: July 3, 2014 00:07 IST

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

 

प्रवीण साळुंके

मालेगावरामनगर ते उमराणेदरम्यान मुंबई - आग्रा महामार्गावरून वाळूची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक करताना सर्व नियम पायदळी तुडविले जात असूनही या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष. या नियमबाह्य वाहतुकीमुळे नागरिकांना विशेषत: वाटसरुंना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी वाटसरुंनी केली आहे.धुळे परिसरातून वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर नाशिककडे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचे यासाठी काही नियम आहेत. त्यात वाहनाची क्षमता, वाळू भरण्याची क्षमता, वाहतूक करताना घ्यावयाची काळजी आदिंचा समावेश आहे. हे नियम पाळले जावे यासाठी त्यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार तहसीलदार तसेच महसूल विभागाला देण्यात आले आहेत. ही वाहतूक करताना सर्वांत महत्त्वाचे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरू नये तसेच ही वाळू पूर्णपणे झाकलेली असावी या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. महामार्गावरून दिवसभरातून पाचशेपेक्षा जास्त वाहनांद्वारे वाळूची वाहतूक करण्यात येत असून, यातील जवळपास सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दोन ते तीन ब्रास जास्त वाळू भरलेली असते. वाहनातील वाळू ही न झाकताच वाहिली जात असून, तर काही वाहनांवर नावालाच हिरवे किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकलेले असते. मालट्रक व लेलनसारखी वाहने न झाकताच नेली जात आहे. त्यामुळे या वाहनातील वाळू उडत असून, ती वाटसरुंना लागते. काहीवेळा ही वाळू डोळ्यात जाऊन डोळ्याला गंभीर दुखापतीही होत आहेत. तसेच यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन वाहने उलटण्याचे प्रमाणही वाढत आहे. तसेच या वाळूपासून संरक्षण करण्याच्या नादात वाहने पुढील वाहनावर आदळतात. त्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीव गमावण्याची वेळ येत आहे. या गौण खनिजधारकांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झालेले आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यास वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहेत. महामार्गावर रोज दोनशे ते तीनशे वाहनांत क्षमतेच्या कित्येकपट वाळू भरून वाहतूक केली जात असताना या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही हे विशेष. येथील उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांत एकाही वाळू वाहनावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या वाहतुकीमुळे जनसामान्य त्रस्त असताना येथील महसूल विभाग तसेच परिवहन विभागाचे अधिकारी काय करतात, असा प्रश्न जनसामान्यात विचारला जात आहे. वाहनधारकांवर कारवाई करून अशा वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.