शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

By admin | Updated: July 3, 2014 00:07 IST

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

 

प्रवीण साळुंके

मालेगावरामनगर ते उमराणेदरम्यान मुंबई - आग्रा महामार्गावरून वाळूची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक करताना सर्व नियम पायदळी तुडविले जात असूनही या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष. या नियमबाह्य वाहतुकीमुळे नागरिकांना विशेषत: वाटसरुंना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी वाटसरुंनी केली आहे.धुळे परिसरातून वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर नाशिककडे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचे यासाठी काही नियम आहेत. त्यात वाहनाची क्षमता, वाळू भरण्याची क्षमता, वाहतूक करताना घ्यावयाची काळजी आदिंचा समावेश आहे. हे नियम पाळले जावे यासाठी त्यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार तहसीलदार तसेच महसूल विभागाला देण्यात आले आहेत. ही वाहतूक करताना सर्वांत महत्त्वाचे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरू नये तसेच ही वाळू पूर्णपणे झाकलेली असावी या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. महामार्गावरून दिवसभरातून पाचशेपेक्षा जास्त वाहनांद्वारे वाळूची वाहतूक करण्यात येत असून, यातील जवळपास सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दोन ते तीन ब्रास जास्त वाळू भरलेली असते. वाहनातील वाळू ही न झाकताच वाहिली जात असून, तर काही वाहनांवर नावालाच हिरवे किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकलेले असते. मालट्रक व लेलनसारखी वाहने न झाकताच नेली जात आहे. त्यामुळे या वाहनातील वाळू उडत असून, ती वाटसरुंना लागते. काहीवेळा ही वाळू डोळ्यात जाऊन डोळ्याला गंभीर दुखापतीही होत आहेत. तसेच यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन वाहने उलटण्याचे प्रमाणही वाढत आहे. तसेच या वाळूपासून संरक्षण करण्याच्या नादात वाहने पुढील वाहनावर आदळतात. त्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीव गमावण्याची वेळ येत आहे. या गौण खनिजधारकांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झालेले आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यास वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहेत. महामार्गावर रोज दोनशे ते तीनशे वाहनांत क्षमतेच्या कित्येकपट वाळू भरून वाहतूक केली जात असताना या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही हे विशेष. येथील उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांत एकाही वाळू वाहनावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या वाहतुकीमुळे जनसामान्य त्रस्त असताना येथील महसूल विभाग तसेच परिवहन विभागाचे अधिकारी काय करतात, असा प्रश्न जनसामान्यात विचारला जात आहे. वाहनधारकांवर कारवाई करून अशा वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.