शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

By admin | Updated: July 3, 2014 00:07 IST

महामार्गावर नियमबाह्य वाळू वाहतूक

 

प्रवीण साळुंके

मालेगावरामनगर ते उमराणेदरम्यान मुंबई - आग्रा महामार्गावरून वाळूची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक करताना सर्व नियम पायदळी तुडविले जात असूनही या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष. या नियमबाह्य वाहतुकीमुळे नागरिकांना विशेषत: वाटसरुंना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी वाटसरुंनी केली आहे.धुळे परिसरातून वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर नाशिककडे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचे यासाठी काही नियम आहेत. त्यात वाहनाची क्षमता, वाळू भरण्याची क्षमता, वाहतूक करताना घ्यावयाची काळजी आदिंचा समावेश आहे. हे नियम पाळले जावे यासाठी त्यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार तहसीलदार तसेच महसूल विभागाला देण्यात आले आहेत. ही वाहतूक करताना सर्वांत महत्त्वाचे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरू नये तसेच ही वाळू पूर्णपणे झाकलेली असावी या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. महामार्गावरून दिवसभरातून पाचशेपेक्षा जास्त वाहनांद्वारे वाळूची वाहतूक करण्यात येत असून, यातील जवळपास सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दोन ते तीन ब्रास जास्त वाळू भरलेली असते. वाहनातील वाळू ही न झाकताच वाहिली जात असून, तर काही वाहनांवर नावालाच हिरवे किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकलेले असते. मालट्रक व लेलनसारखी वाहने न झाकताच नेली जात आहे. त्यामुळे या वाहनातील वाळू उडत असून, ती वाटसरुंना लागते. काहीवेळा ही वाळू डोळ्यात जाऊन डोळ्याला गंभीर दुखापतीही होत आहेत. तसेच यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन वाहने उलटण्याचे प्रमाणही वाढत आहे. तसेच या वाळूपासून संरक्षण करण्याच्या नादात वाहने पुढील वाहनावर आदळतात. त्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीव गमावण्याची वेळ येत आहे. या गौण खनिजधारकांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झालेले आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यास वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन विभागाला आहेत. महामार्गावर रोज दोनशे ते तीनशे वाहनांत क्षमतेच्या कित्येकपट वाळू भरून वाहतूक केली जात असताना या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही हे विशेष. येथील उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांत एकाही वाळू वाहनावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या वाहतुकीमुळे जनसामान्य त्रस्त असताना येथील महसूल विभाग तसेच परिवहन विभागाचे अधिकारी काय करतात, असा प्रश्न जनसामान्यात विचारला जात आहे. वाहनधारकांवर कारवाई करून अशा वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.