शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

यंदापासून सर्वत्र थेट सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. बागलाण तालुक्यातही येत्या शनिवारी (दि. ७) सरपंचपदाच्या तब्बल ३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांनी उडी घेतली असून, त्यांच्यासमोर तरुणाईने आव्हान उभे केले आहे.

सटाणा : यंदापासून सर्वत्र थेट सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. बागलाण तालुक्यातही येत्या शनिवारी (दि. ७) सरपंचपदाच्या तब्बल ३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांनी उडी घेतली असून, त्यांच्यासमोर तरुणाईने आव्हान उभे केले आहे. बहुतांशी गावांमध्ये भाऊबंदकीतच रामायण सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक उभे ठाकल्याने निवडणुकीच्या अंतिम चरणात या अस्तित्वाच्या लढाईमुळे चुरस निर्माण होऊन गावगाड्याचे राजकारण आॅक्टोबरच्या चटक्यामध्ये अधिकच धगधगत असल्याचे चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत आहे.येत्या शनिवारी होत असलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक होत आहे. यापैकी तब्बल १९ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार म्हणजे कारभारीण घराऐवजी आता गाव सांभाळणार आहे, तर उर्वरित गावात कारभारीच कारभार पाहणार आहेत. बागलाणमध्ये विविध ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. गावगाड्यात सुरू असलेल्या या वर्चस्वाच्या लढाईत सर्वच उमेदवार साम, दाम, दंड, भेद या सर्वच अस्त्रांचा वापर करत असल्यामुळे साहजिकच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मिनी ‘झेडपी’ची अनुभूती येत आहे. बहुतांश ठिकाणी लोकसभा, विधानसभा ते झेडपी, पंचायत समितीच्या राजकारणात सक्रिय राहून गावगाड्याचे राजकारण करणारे पुढारीदेखील रिंगणात आहेत. त्यांनी निवडणुकीत दाखविलेल्या निष्ठेचादेखील कस लागणार आहे. त्यामुळे खासदार-आमदार, झेडपी सदस्य हे केलेल्या कामाची परतफेड करतात, की ‘अब तेरी बारी’ म्हणून उट्टे काढतात या घडामोडीदेखील तालुका पातळीवर बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत असून, विरोधकांनी ऐन निवडणुकीत कात्रजचा घाट दाखविल्यामुळे ‘हम हम है’ ची भाषा करणाºयांची अक्षरश: भंबेरी उडाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा लक्षवेधी लढती बघायला मिळत आहेत.माजी सरपंच शांताराम बंडू अहिरे, माजी सभापती अनिल रामदास अहिरे, माजी उपसरपंच विश्वास पंडितराव मोरे, डॉ. कांतिलाल वेडू देवरे, संदीप चिंतामण ब्राह्मणकर, कडू राणू अहिरे, मच्ंिछद्र केदा खैरनार, योगेश रामदास खैरनार, उत्तम लक्ष्मण जाधव, वीजेंद्र सुभाष बच्छाव, पोपट भावराव मोरे, अशोक तुकाराम सोनवणे हे रिंगणात असून, बहुतांश उमेदवार जातीय समीकरण आणि भाऊबंदकीच्या जोरावर रणांगणात उतरले आहेत. या गावावर माळी आणि वाणी समाजानेच राज्य केल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्याला दलित आघाडीचे पंडित अंबर मोरे यांच्या कुटुंबाचा अपवाद वगळता समाजाच्या एकगठ्ठा मतांवर दोन्ही समाजाच्या हातातच गावाची सत्ता राहिली आहे.या निवडणुकीत माजी सरपंच शांताराम अहिरे, माजी आमदार संजय चव्हाण समर्थक अनिल अहिरे या माळी समाजाच्या उमेदवारांबरोबर वाणी समाजाचे संदीप ब्राह्मणकर या तुल्यबळ उमेदवारांना मराठा समाजाचे बोटावर मोजण्याइतके मतदान असताना, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असलेले मराठा समाजाचे डॉ. कांतिलाल देवरे, दलित आघाडीचे नेते पंडित अंबर मोरे यांचे सुपुत्र विश्वास मोरे यांनीदेखील जनसंपर्क आणि अल्पसंख्याक गोळा करून आव्हान दिले आहे. एकंदरीत जायखेडा येथील निवडणुकीत वतन राखण्यासाठी माळी आणि वाणी समाजाला यश येते, की जनसंपर्काच्या जोरावर दलित मराठा वतनदारी मोडीत काढतात हे निकालाच्या दिवशीच कळेल.