शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

शिक्षकांची आधुनिक काळातील भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

सिन्नर: येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी ...

सिन्नर: येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी प्रशिक्षण वर्गाचे दुसऱ्या दिवसाचे सत्र संपन्न झाले. यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मविप्र एचआरडीसी संचालक डॉ. ए. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी व्याख्यानातून आधुनिक काळातील शिक्षणाची भूमिका विशद केली. शिक्षकांनी अपडेट असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अवांतर वाचन अध्यापनात उपयुक्त ठरते, त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता आला पाहिजे, असे स्पष्ट केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी मनोगतात शिक्षण व शिक्षण प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणच तरुणांचा सर्वांगीण विकास घडवून आणेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. वाय. संत यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे, असा संदेश दिला.

दुसऱ्या सत्रात डॉ. एस.बी. अहिरे यांनी ''रोल ऑफ लायब्ररी ॲण्ड लायब्ररियन इन टिचींग लर्निंग ॲण्ड रिसर्च ऍक्टिव्हिटी'' या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक काळातील ई लर्निंग, ई बुक आदीविषयी सविस्तर चर्चा केली. ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असल्याने ग्रंथांचा व ग्रंथालयाचा वापर करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. जी. पी. चिने यांनी ग्रंथालयाची आवश्यकता स्पष्ट केली. अतिथींची ओळख प्रा.डी.जे. पगार यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. झेड. ठाकरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सी. जे. बर्वे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर. टी. गुरुळे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. एस बी पाटोळे यांनी मानले.