शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’चे मजूर वळाले वैयक्तिक लाभाकडे !

By admin | Updated: July 8, 2017 01:04 IST

नाशिक : १९७२ मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ केली, त्या रोजगार हमी योजनेचा मुख्य हेतूच अल्प मजुरीमुळे बाजूला पडत चालला आहे.

श्याम बागुल। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशाला दिशादर्शक ठरलेल्या राज्याच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रूपांतर देशपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत झाले असले तरी, ज्या कारणासाठी महाराष्ट्राने १९७२ मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ केली, त्या रोजगार हमी योजनेचा मुख्य हेतूच अल्प मजुरीमुळे बाजूला पडत चालला असून, गावोगावच्या मजुरांनी ग्रामविकासाच्या सामूहिक कामांकडे काणाडोळा करीत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्येच आपले योगदान देत शासनाचा दुहेरी फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. हातांना काम व शहरी भागाकडे मजुरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, शेततळे, जमिनीचे सपाटीकरण, वृक्षलागवड, नालाबंधारा यांसारख्या गावपातळीवर सामूहिक गरजेची लाखो कामे आजवर केली गेली. ग्रामीण भागातील गोरगरीब बेरोजगारांना वरदान ठरलेल्या या योजनेच्या धर्तीवरच केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गत गाव पातळीवर वयाच्या अठरा वर्षांपुढील व्यक्तीला मजुरी करण्यायोग्य समजण्यात येऊन त्यासाठी नोंदणी व जॉब कार्ड देण्यात आले आहेत. ज्यांची मजूर म्हणून नोंदणी झाली आहे, त्यांना काम देणे शासनावर बंधनकारक असल्याने त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सामूहिक कामांना दरवर्षी मंजुरी दिली जात असली तरी या कामांची उपलब्धता व उपयोगितेचा विचार करता ती नाममात्र ठरू लागली आहेत. साधारणत: गेल्या तीन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे स्वरूप बदल ण्यास सुुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्याबरोबरच, शहरी भागाकडे होणारे स्थलांतर टळण्यास मदत होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, स्त्रीकर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग असेल्या व्यक्तींसाठी वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजना तळागाळापर्यंत तसेच खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांची उभारणी, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल, इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची कामे करण्यासाठी ज्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, त्यांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच स्वत:च स्वत:च्या घराची उभारणी करायची; मात्र त्याची मजुरी शासनाकडून मिळणार आहे. अशा प्रकारे दुहेरी लाभ रोहयो मजुरांच्या पदरात पडू लागल्याने त्यांनी सार्वजनिक व सामूहिक रोजगार हमी योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्येच आपला सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे, परिणामी गाव पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी रोजगार हमी योजनेची कामे कमी झाली आहेत.